सरकारने वेळ घेतला कारणं सांगू नका आता टिकणारे आरक्षण द्या-मनोज जरांगे पाटील
गणेश दळवी आष्टी-मंञ्यांशी संबंध प्रस्तापित करण्यासाठी मी अंदोलन केले नाही,माझा समाज माझ्यासाठी प्रिय आहे.समाजातील पोरांचे मुडदे पडत आहेत.ते थांबविण्यासाठी अंदोलन करत आहे.एका टक्काने नोकरी,प्रवेश हुकलेल्या पोरांना विचारा,त्यांच्या काळजाचा थरकाप कसा होतोय,बाप राञदिवस काबाड कष्ट करून,पोरांना शिकवितो.प्रत्येक बापाचं स्वप्न असतं माझा मुलगा अधिकारी व्हावा,त्याचा अंगावर वर्दी चढावी व त्याचे स्वप्नं भंग होते,त्याचे मुळ कारण आरक्षण आहे.आणि तेच आपल्याला मिळवायचं आहे.यासाठी आता तुमच्यात फूट पडू देऊ नका.सध्या आरक्षण निर्णयाच्या प्रक्रीयेत आले आहे.आता या संधीचं सोनं करा कारण सरकारने आरक्षणासाठी आपल्याकडे तीस दिवसाची मुदत मागून कायम टिकणारे आरक्षण देतो म्हणाले होते.आपण त्यांना ४० दिवस दिले.आता सरकारने आपल्या कढून वेळ घेतला कारणं सांगू नका,आता टिकणारे आरक्षण द्या नसता सरकारची मराठ्यांशी गाठ असल्याचे प्रतिपादन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.
मराठा समाजाला आरक्षणासाठी आंतरवाली येथे उपोषणानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा संवाद याञा सुरू केली आहे.याअंतर्गत त्यांनी आष्टी तालुक्यात शुक्रवार दि.६ रोजी सांयकाळी ७.३० वा.आष्टी येथील छञपती शिवाजी महाराज चौक येथे मराठा समाजाने आयोजित करण्यात आलेल्या सभेत मनोज पाटील बोलत होते.यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले,आमच्या मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून माझे शांतते अंदोलन सुरू होतं पण सरकारला काय झालं काय माहित त्यांनी आपल्या आई-बहिणीवर हल्ला केला.हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिले.हे अंदोलन आता पेटले,सरसकट मराठे शेतकरी आहेत.
पण आर्धा मराठ्यांना आरक्षण आर्ध्या मरठ्यांना आरक्षण नाही.हे बरोबर नाही.सरकारने आम्हाला एक महिन्याचा आवधी मागितला अन् म्हणाले तुम्हाला कायम टिकणारे आरक्षण देतो.सरकारचा असा डाव होता आपण त्यांना वेळ देणार नाही.पण मी त्यांचा डाव ओळखला होता.कारण मी पण मराठ्याचं पिल्लू आहे.सरकार मला तीस दिवसाचा वेळ मागत होते आपण त्यांना चाळीस दिवस दिले.आता सरकारला वेळ पाहिजे होता तो दिला आता सरकारने ठरलेल्या वेळेप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण न वळवळ करता द्यावे असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.आता मराठा कुणबी एक असूनही त्यांना आरक्षण द्या,सरकारने आरक्षणाचा सौदा मांडला होता.पण आपण त्यांचा सौदा मोडून आपण आपल्या एकीतून मोडून काढला असून आता सरसकट आरक्षण मिळालेच पाहिजे तो पर्यंत आपण शांत बसणार नसल्याचे जरांगे यांनी सांगीतले.
५० जेसीबी ने ५ क्विंटल फुलांची उधळण करत केले स्वागत
आष्टी शहरातील जामगांव फाटा ते तलवार नदी राष्ट्रीय महामार्गालगत जवळपास ५० जेसीबीच्या सहाय्याने मनोज जरांगे यांच्यावर ५ क्विंटल फुलांची उधळण करत,शेकडो तोफांची आतीषबाजी करत त्यांचे शहरात मराठा समाजबांधवांनी आगळे-वेगळे स्वागत केले.यापुर्वी आष्टी शहरात मंञी,उपमुख्यमंञी,मुख्यमंञी येऊन गेले पण असे स्वागत कुणाचेच करण्यात आले नाही.
मुस्लिम बांधवांच्यावतीने पाण्याची सोय
आष्टी शहरात आयोजित करण्यात आलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या सभेस हजारोच्या संख्येने उपस्थित होता.या ठिकाणी आलेल्या मराठा समाज बांधवांची पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून अर्धा व एक लिटर सिलबंद पाणी बाटल्यांची सोय आष्टी शहरातील मुस्लिम बांधवांनी करत आदर्श निर्माण केला आहे.
तालुक्यातील या गावांनी उपोषण करून दिला पाठिंबा
घाटा पिंप्री,चिंचाळा,केळसांगवी,चोभा निमगांव,
खुंटेफळ,फत्तेवडगांव,दौलावडगांव,बेलगांव,जामगांव,
यासह आदि गावांनी मनोज जरांगे यांचे आंतरवली येथे सुरू असलेल्या उपोषणास आपल्या गावात उपोषण करून पाठिंबा दिला होता.
मला तुमच्या आष्टीतून सुध्दा काळजी घेण्यासाठी फोन आला
अंदोलनाची धग महाराष्ट्रात पोहचली असून,माझी काळजी राजकारण्यांना पडली आहे.ते मला फोन करतात आणि म्हणतात तुम्हाला धोका आहे,काळजी घ्या,आम्ही आहोत तुमच्यासोबत तुम्ही टेशंन घेऊ नका अशी काळजी त्यांना पडली आहे.आणि असा काळजीचा फोन तुमच्या आष्टीतून पण आला पण कोणत्या नेत्यांनी फोन केला हे माञ जरांगे पाटील यांनी सांगण्याचे टाळले.