व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

मराठा आरक्षण अंदोलन मिटले पण;संभ्रम कायम

मुदत 24 डिसेंबर की 2 जानेवारी ची

0

click2ashti update-मराठा आरक्षणाचा शब्द सरकारने दिल्यानंतर आंदोनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले आहे. असे असले तरी आरक्षणसाठी देण्यात आलेल्या अल्टिमेटची दिनांक आणि सरसकट कुणबी प्रमाणपत्र या दोन मागण्यांवरुन दोघांमध्ये संभ्रम असल्याचे दिसून येत आहे. या बाबत मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील विसंवाद स्पष्ट होतोय.मनोज जरांगे हे 24 डिसेंबर तर मुख्यमंत्री शिंदे हे 2 जानेवारीपर्यंतची मुदत दिल्याचे सांगत आहेत.
मराठा समाजासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी आधीपासूनच सरसकट मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करत आहेत. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मागणीचे खंडन केले आहे. ज्यांच्याकडे कुणबी नोंदणी आहे, त्यांनाच मराठा आरक्षण देण्याची मनोज जरांगे यांनी मागणी केली असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.या मुद्यावरही दोघांमध्ये विसंवाद असल्याचे दिसून येत आहे.
नेमका काय आहे संभ्रम
आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनस्थळी उपोषण मागे घेतल्यानंतर साधलेल्या संवादामध्ये महाराष्ट्रातील सरसकट सर्व मराठ्यांना आरक्षणाला लाभ घेता आला पाहिजे, अशी मागणी केली असल्याचे सांगितले होते. तसेच मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यासाठी सरकारला 24 डिसेंबरपर्यंतची मुदत दिल्याचेही त्यांनी सांगितले. असे असले तरी दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र सरसकट आरक्षणावर चर्चा झाली नसून कुणबी नोंद असणाऱ्यांना तातडीने प्रमाणपत्र दिली जावीत,यावर चर्चा झाल्याची असल्याची भूमिका पत्रकार परिषदेत मांडली आहे. त्यामुळे या संदर्भात संभ्रम निर्माण झाला आहे. तर मनोज जरांगे पाटील हे 24 डिसेंबरपर्यंतची मुदत दिल्याचे सांगत असले तरी सरकारच्या वतीने 2 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
सरकारचे प्रतिनिधी आणि मनोज जरांगे यांच्यातील संवाद
सरकारच्या वतीने मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करण्यासाठी तज्ज्ञ आणि मंत्र्यांची एक टीम तयार करण्यात आली होती. यात मंत्री धनंजय मुंडे यांचाही समावेश होता. या चर्चेदरम्यान मनोज जरांगे यांनी डिसेंबरपर्यंत मुदतीचा उल्लेख केला होता. मात्र, धनंजय मुंडे यांनी आज 2 नोव्हेंबर आहे. त्यामुळे 2 महिने म्हणजे 2 जानेवारीपर्यंत वेळ देण्याची मागणी केली होती. हा संवाद झाला तेव्हा सर्व माध्यमांचे प्रतिनिधी देखील तेथे उपस्थित होते.
मनोज जरांगे पाटील यांचा 24 डिसेंबरचा दावा
वास्तविक उपोषणामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या रुग्णालयातून त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना 24 डिसेंबरची मुदत दिल्याचा उल्लेख केला आहे. मात्र,काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2 जानेवारीचा उल्लेख केला होता.यामुळेच हा संभ्रम निर्माण झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.