शिंपोरा योजनेची प्रसिध्दीची घाई म्हणजे “मेहनत करे मुर्गा…अंडा खाये फकीर अशी होय-आमदार आजबे यांची पञकार परिषदेत टिका
पाणी येण्या आगोदरच श्रेयवाद पेटला...
click2ashti update-शिंपोरा ते खुंटेफळ साठवण तलावात पाईपलाईचे काम लवकरात-लवकर पुर्ण कसे होईल याबाबत आ.सुरेश धस,माजी धोंडे व माजी आ.दरेकर यांचे देखील यासाठी श्रेय आहे.हि निविदा निघावी म्हणून गेल्या महिनाभरापासून मुंबईत तळ ठोकून पाठपुरवठा केला.परंतु या योजनेचे निविदा निघताच त्याचा फोटो पाठवून प्रसिध्द करणे म्हणजे “मेहनत करे मुर्गा अन् अंडा खाये फकीर” अशी आवस्था झाली असल्याची टिका आ.बाळासाहेब आजबे यांनी आ.सुरेश धस यांच्यावर केली आहे.
आष्टी येथील राष्ट्रवादी काॅग्रेस भवन येथे दि.९ रोजी दुपारी १२ वा.आयोजित करण्यात आलेल्या पञकार परिषदेत आ.बाळासाहेब आजबे बोलत होते.पुढे बोलतांना आ.आजबे म्हणाले,खुंटेफळ साठवण तलावाच्या शिंपोरा ते खुंटेफळ साठवण बी-१ ची निविदा निघताच त्या पञाची तीन दिवसापुर्वी उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते घेऊन त्याची प्रसिध्दी करत मी च ही योजना मंजूर केल्याचे त्यांनी सांगितले.परंतु हि योजना तुम्हीच आणली,तुम्हीच पुर्ण केली,तुम्हीच पुर्ण करणार पण ह्या योजनेत जर मागील वर्षी निविदा मंजूर झाली त्यावेळेस कोणी खोडा घातला आणि जर खोडा घातला नसता तर आत्ता पर्यंत ५०% काम पूर्ण झाले असते असो पण आता ह्या कामाला मंजूरी मिळावी म्हणून आपण स्वत;मुंबईला तळ ठोकून या योजनेचा पाठपुरवठा करत आलो मुख्यमंञी,उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस,अजित दादा पवार यांच्या संपर्कात राहून,आपण अजित दादा बरोबरच खुंटेफळच शब्द घेऊन त्यांच्या गटात गेलो आहोत.आणि विधान परिषदेच्या आमदार महोदय साहेबांना जर हे टेडंर फ्लॅश करायचे होते तर एक वर्ष अगोदर त्यांचे सरकार आले होते.पण आम्ही सरकारमध्ये सहभागी झाल्यावरच गती का? आली असो यात आपल्याला पडायचे नाही.पण या योजनेसाठी नुसत्या एका व्यक्तीने श्रेय घेणे चुकीचे असून,ही योजना पुर्ण व्हावी म्हणून माजी आ.साहेबराव दरेकर,माजी आ.भीमराव धोंडे यांच्यासह सर्वांचेच श्रेय यात आहे.त्यामुळे कुणीही एकाने हे श्रेय घेऊ नये असा सल्लाही आ.बाळासाहेब आजबे यांनी दिला.
आगोदरचे १४०० कोटी चुकीचे आता बरोबर कसे
एक वर्षापुर्वी आपण तत्कालीन जलसंपदा मंञी जंयत पाटील यांनी १४०० या योजनेची निविदा काढण्याचे आदेश देण्यात आले होते.परंतु हि निविदा चुकीची असल्याचे सांगत यात जर खोडा घातला नसता तर आत्ता पर्यंत ही योजना पन्नास टक्के पुर्ण होऊन कामाची गती दिसली असती परंतु मी पणा मुळे मतदार संघाचे वाटोळे होईल असे कुणी नेत्याने घेणे म्हणजे चुकीचे असल्याचेही आ.आजबे यांनी सांगीतले.