व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

बीड जिल्ह्यातील आणखी एक मल्टीस्टेट धोक्यात..! ऐन दिवाळीत मल्टीस्टेटचे वाजले दिवाळं

हजारो कोटी रूपायांची ठेवी असलेल्या मल्टीस्टेट बंद

0

click2ashti update-गेल्या वर्षभरात साधारणपणे दहा ते बारा मल्टीस्टेटला कुलूप लागल्याने ठेवीदारांचे धाबे दणाणले आहेत.मल्टीस्टेटच्या माध्यमातून हजारो रूपायांच्या ठेवी गोळा करत त्यातून हे मल्टीस्टेट चालक गोरगरीबांच्या ठेवलेल्या ठेवीतून आपला गोरख धंदा म्हणजे कारखाना,प्लाॅटींग शिवाय शिक्षण क्षेञातही काम करतात पण आता अशीच एक मल्टीस्टेट याचा कारभार महाराष्ट्रसह कर्नाटक जिल्ह्यात सुरू असून जवळपास ५० शाखा विस्तारीत असून मुख्यशाखा बीड जिल्ह्यात आहे.परंतु ही मल्टीस्टेट धोक्यात आली असुन,लवकरच तिचे टंपाळ वाजणार असल्याचे दिसून येत आहे.
याबावत अधिक असे की,गेल्या महिनाभरात बीड जिल्ह्यातील जिजाऊ मल्टीस्टेट,श्रीसाईराम अर्बन,ज्ञानराधा मल्टीस्टेट यांचे टंपाळ वाजल्याने शेकडो ठेवीदारांचे कोट्यावधीरूपये या मल्टीस्टेटमध्ये अडकले आहेत.अन् ऐन दिवाळीतच ह्या मल्टीस्टेट बंद पडल्या असल्याने ठेवीदारांचे जीव टांगणीला लागले आहेत.आता पुन्हा एका बीड जिल्ह्यातील राज्याच्या कृषीमंञी असलेल्या तालुक्यातील असलेली मोठी मल्टीस्टेट बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून येत आहे.कारण या मल्टीस्टेटने आपल्या संभाजीनगर,बीड,परळी,अहमदनगर या शहरासह इतर शहरातील शाखा मंगळवार पर्यंत बंद ठेवण्याच्या सुचना संबंधित शाखाधिका-यांना दिल्या असल्याचे समजते.
जेव्हा लोकांचा पैसा बापाचा असल्यासारखा वापरतात
दरम्यान मल्टीस्टेट काढून दुकानदारी सुरू करत जास्त व्याजदराचे अमिष दाखवून लोकांनी पै-पै करत या मल्टीस्टेटमध्ये जास्त व्याज मिळावे म्हणून ठेवी ठेवतात.प्रत्येक मल्टीस्टेटमध्यै आपल्या इतरञ असलेल्या शाखेत जमा झालेले पेसे मुख्य शाखेत मागून घेतात.व या शाखेतील जमा झालेले लोकांचे पैसे आपल्या बापाचे पैसे असल्या सारखे वापरून मल्टीस्टेट धोक्यात आणतात व यामध्ये सर्वसामान्य गुंतवणूकदारांचे माञ कंबरडे मोडते.
एकल कारभारामुळे मल्टीस्टेट अडचणीत
छञी उगल्यासारखे मल्टीस्टेट,अर्बन निधी स्थापन एखाद्या शहरात,गावात मुख्यठिकाणी सुसज्य अशी व्यापारपेठेत जागा शोधून लाखो रूपये फर्निचरला खर्च करत लोकांना जास्त व्याजदराचे अमिष दाखवत ठेवींच्या रूपात पैसे जमा करतात सदरील जमा झालेला पैसा आपल्या मुख्य शाखेला जमा करून घेतात आणि आपल्या एकल कारभार करत आपले नुकसान झाले तर चक्क मल्टीस्टेटच बंद करतात त्यामुळे मल्टीस्टेट अडचणीत येतात.
हजारो कोटी रूपायांची ठेवी असलेली मल्टीस्टेट बंद
गेल्या पाच वर्षापुर्वी भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) हि जळगांव जिल्ह्यातीत मल्टीस्टेट सुमारे तीन राज्यात शाखेंचा विस्तार ४५० पेंक्षा अधिक शाखा व हाजारो कोटी ठेवी अन् कर्जही मोठ्या प्रमाणात वाटप तरीही हि मल्टीस्टेट बंद पाडली.त्यामुळे गुंतवणूकदारांनी जास्त व्याजाची आपेक्षा न करता आपल्या स्थानिक व राष्ट्रीयकृत बॅकेतच व्यवहार करावा.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.