व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

कोल्हापुरी बंधाऱ्याच्या माध्यमातून तालुक्यात जलसमृद्धी होणार

आ.बाळासाहेब आजबे यांचे प्रतिपादन

0

click2ashti-आष्टी तालुका हा कायमच दुष्काळग्रस्त असून या ठिकाणी प्रत्येक वर्षी पावसाचे प्रमाण हे कमी राहिले आहे. जो पाऊस होतो त्याचे पाणी वाहून जात असल्यामुळे त्याचा तालुक्यात कसल्याही प्रकारचा फायदा होत नव्हता त्यामुळे आपण तालुक्यामध्ये विविध ठिकाणी कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे तयार करत असून याच बंधाऱ्यामुळे तालुक्यामध्ये जलसमृद्धी होणार असल्याचे प्रतिपादन आमदार बाळासाहेब आजबे यांनी केले.

आष्टी तालुक्यातील डोंगरगण येथील एक कोटी 74 लक्ष रुपयांच्या कोल्हापुरी पद्धतीच्या बंधारा उद्घाटन प्रसंगी बोलत होते.यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्य सतीश शिंदे,सुनिल नाथ,जगन्नाथ ढोबळे हरिभाऊ दहातोंडे,संदिप सुंबरे,महादेव डोके,शिवाजी शेकडे, उपअभियंता काकडे आदी मान्यवर उपस्थित होते.आष्टी तालुक्यातील डोंगरगण येथील एक कोटी 74 लक्ष रुपये कोल्हापुरी बंधारा एक कोटी सत्तर लक्ष रुपये तर वाघळूज कोप बंधारा दोन एक कोटी ६४ लाख रुपये वाघळूज ग्रेटेड बंधारा 35 लाख रुपये व नांदूर येथील कोप बंधारा 95 लक्ष रुपये या कोल्हापुरी पद्धतीच्या सर्व कामाचे भूमिपूजन सोमवार दिनांक 4 डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी पुढे बोलताना आमदार आजबे म्हणाले की, डोंगरगण या गावांमध्ये आज एक कोटी 74 लक्ष रुपयांच्या बंधाऱ्याचे उद्घाटन झाले असून यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.तालुक्यामध्ये पाऊस पडतो थोड्याफार प्रमाणात मात्र ते पाणी वाहून जाते.पाणी वाया जात असल्याची अडचण लक्षात घेऊन हा बंधारा तयार करत असून आणखी दोन बंधारे मार्च अखेरपर्यंत डोंगरगण गावामध्ये मंजूर करणार असल्याची माहिती दिली.दुष्काळी भागासाठी या बंधाऱ्यांचा फायदा होणार असून मतदारसंघात 68 कोटी रुपयांचे बंधारे मंजूर झाले आहेत.आणखी मार्च अखेरपर्यंत 30 कोटी रुपयांचे बंधारे होणार असून यामुळे नदीला वाहून जाणारे पाणी आडविल्यामुळे शेकडो एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे तसेच गुत्तेदारांनी सदरील बंधाऱ्याचे कामे लवकरात लवकर व दर्जेदार करून शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी युवा कार्यकर्ते दिलीप चव्हाण यांनी प्रास्ताविकात आमदार आजबे यांनी गावांमध्ये केलेल्या विकास कामांची माहिती दिली. सभामंडप रस्ता पाण्याची टाकी या सर्व विकास योजना आमदार आजबे यांनी प्रभावीपणे राबविल्यामुळे गावचा विकास झाल्याचे त्यांनी सांगितले यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सतीश शिंदे,सुनील नाथ, जगन्नाथ ढोबळे,हरिभाऊ दहातोंडे,महादेव डोके,भाऊसाहेब घुले,संतोष गुंड शिवाजी शेकडे सरपंच मसोबाची वाडी,भीमराव घोडके,अर्जुन काकडे! विशाल झांबरे ज्ञानेश्वर वाघ परमेश्वर कर्डिले भीमराव चव्हाण काकासाहेब कर्डिले,राम गोंदकर,राम कर्डिले,बाळासाहेब पिसाळ,पप्पू लोखंडे,संजय चौधरी,विशाल झांबरे,शामराव फसले,सचिन कोहक,दिलीप चव्हाण, भीमराव बोडके,भरत जाधव,संजय विधाते,उद्धव विधाते,विधाते छबू, रिंगणे रावसाहेब गुंड,उत्तम चौधरी,तुळशीराम गुंड,नवनाथ राठोड,गणेश पवार,शिवाजी गाडे,रावसाहेब दळवी,संजय चौधरी,चंद्रकांत वामन,नवनाथ शेलार,दिलीप चव्हाण,नामदेव शेळके,विशाल भामरे,गणेश पवार,नवनाथ शेलार,शामराव कसले,सतीश विरकर,दादा राऊत,पप्पू गवळी,ज्ञानेश्वर वाघ,परमेश्वर कर्डिले यांच्यासह डोंगरगण वाघोली नांदूर परिसरातील शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.