व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

सहा वर्षाचा वाद उकरून काढत;सहा जणांच्या टोळक्यानी तरूणाचा जीव घेतला

आष्टी तालुक्यातील दैठणा येथील घटना

0

click2ashti update-गुन्ह्यात पोलिसांना नाव सांगितल्याचे कारण काढत एका ३६ वर्षीय तरूणांचा सहा जणांनी धारदार चाकू,दगड,बांबूने गंभीर जखमी केल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दैठणा येथे घडली आहे.एवन हैवान काळे रा.चिखली ता.आष्टी असे मयत तरूणाचे नाव आहे.


आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलिस ठाणे हद्दीतील केळपिंपळगांव येथे २०१७ रोजी चोरीची घटना घडली होती.यात काही आरोपीना अटक केली होती.त्या गुन्ह्यात आमचे नाव पोलिसांना का सांगितले असे कुरापत काढून सहा जणांना वाकी मिरजगांव रोडवरील दैठणा येथील वाघजाई हाॅटेल समोर ६ डिसेंबर रोजी सायकाळच्या दरम्यान चाकू,दगड,बांबूने मारहाण केली.यात धारदार चाकूने पायाला खोलवर जखम झाल्याने यातुन मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याने अहमदनगर येथे उपचारासाठी घेऊन जात होतो.रूग्णालयात दाखल करताच डाॅक्टरानी मृत घोषित केले.मयताची पत्नी सचिनाबाई उर्फ कांचन एवन काळे हिच्या फिर्यादीवरून आरोपी संदिप उध्दव काळे,कानिफनाथ उध्दव काळे,संदिप ईश्वर भोसले,कृष्णा विलास भोसले,अजय विलास भोसले,उध्दव आगुचंद काळे सर्व रा.वाकी ता.आष्टी याच्यावर गुरूवारी आष्टी पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपी फरार असून पोलिस तपास पोलीस उपनिरीक्षक अजित चाटे करीत आहेत.घटनास्थळी आष्टीचे उपअधीक्षक अभिजीत धाराशिवकर,पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस, पोलीस उपनिरीक्षक अजित चाटे,पोलिस अंमलदार सचिन गायकवाड, दिपक भोजे,मजरूद्दीन सय्यद,यांनी भेट दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.