मच्छिंद्रनाथ देवस्थान संजीवनी समाधीचे नाईलाजास्तव बंद करावे लागले त्याबद्दल भाविकांची माफी मागतो-आ.सुरेश धस
देवस्थानचे विश्वस्त आ.सुरेश धस यांची पञकार परिषद
click2ashti update-दरवर्षी प्रमाणे गुढी पाडव्याच्या आदल्या दिवशी मच्छिंद्रनाथ देवस्थान समाधीचे दर्शन सर्वसामान्यांसाठी वर्षातुन एकदाच खुले होते.परंतु यावर्षी अनपक्षेती पणे जास्तीचे भाविक दर्शनासाठी आल्याने चेंगरा चेंगरीचे प्रमाण वाढले जर वेळीच दर्शन बंद केले नसते तर अघडीत घडले असते त्यामुळे राञी अडीच वाजता दर्शन बंद करावे लागले त्यामुळे आम्ही सर्व नाथ भक्तांची माफी मागतो आणि पुढील वर्षी दर्शनासाठीची चांगली सोय करण्याची ग्वाही देतो असे मच्छिंद्रनाथ देवस्थानचे विश्वस्त आमदार सुरेश धस यांनी सांगितले.
आष्टी येथील औव्दैतचंद्र या निवासस्थानी दि.१२ शुक्रवार सकाळी १०.३० वा.आयोजित करण्यात आलेल्या पञकार परिषदेत आमदार सुरेश धस बोलत होते.पुढे बोलतांना आ.धस म्हणाले,मच्छिंद्रनाथ देवस्थान सावरगांव यावर्षी गुढी पाडव्याच्या आदल्या दिवशी वर्षातुन एकदा समाधी राञीभर सर्व सामान्य नागरीकांना दर्शनासाठी खुली असती परंतु यावर्षी दुर्देवाने राञी २.३० वा.दर्शनासाठी बंद करावी लागली.त्या गैरसोय बद्दल आम्ही नाथ भक्तांची माफी मागतो असे आमदार धस यांनी सांगीतले.तसेच पुढील वर्षापासून कावडीने पाणी व लेप लावले हा कार्यक्रम एक दिवसात घेयचा की दोन दिवसात याचा निर्णय देवस्थान समिती घेईल.व काहि भाविकांनी मोठ्या प्रमाणावर १००० हजार रूपायाच्या देणगी पावती फाडल्या आहेत.या पावत्या अध्यक्ष ९४२३११६४१४ व सचिव ७७९८७५००७५ या दोघांचे मोबाईल नंबर सदरील पावतीवरही आहेत.ज्या भाविकांनी पावती घेऊनही दर्शन झाले नाहीत त्यांचे देगणी दिलेल्या पावत्यांची रक्कम परत देणार आहोत.
याकडे विशेषता नगर,पुणे,नाशीक येथील भाविकांची जास्त प्रमाणावर देणगी पावती घेतली आहे.जो कुणी पावती आणून देईल ती रक्कम परत देण्यात येईल.तसेच RTGS द्वारेही रक्कम परत देण्यात येईल असेही आमदार धस यांनी सांगीतले.