व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

जिल्ह्यात जाती-पातीच्या राजकारणाला महत्व नाही-पंकजा मुंडे;हि निवडणूक हालक्यात घेऊ नका-ना.धनजंय मुंडे

पुढील पन्नास वर्षाचा विकासासाठी सर्वांनी एकदिलाने काम करावे-ना.धनजंय मुंडे

0

click2ashti update-एकवेळेस माझ्या सांगण्यावर देशाच्या आणि जिल्ह्याच्या हितासाठी मतदान करा पुढच्यावेळेस मी मत मागायला येणार नाही.सत्तेच्या बाहेर राहिल्यावर काय होते.हे मी आणि जिल्ह्याने पाहिले आहे.त्यामुळे जिल्ह्यात आणि देशात मिळते जुळते मत दिल्यास जिल्ह्याच्या कायापालाट केल्याशिवाय राहणार नाही अशी ग्वाही पंकजा मुंडे तर येणा-या पाच वर्षात पुढील पन्नास वर्षाचा विकास करून घेण्यासाठी व बीड जिल्ह्याला केंद्राचे मंञीपद मीळण्यासाठी पंकजा मुंडे यांना भरघोस मतांनी विजय करण्याचे आवाहन जिल्ह्याचे पालकमंञी धनंजय मुंडे यांनी केले आहे.
बीड लोकसभा-३९ महायुतीचा उमेदवारी अर्ज आज बुधवार दि.२४ रोजी दुपारी दोन वा.दाखल करण्यात आला.यावेळी बीड येथील माने काॅम्पलॅक्स समोरील मैदानात आयोजित करण्यात आलेल्या सभेत संबोधित करतांना पंकजा मुंडे बोलत होते.याप्रसंगी पालकमंञी ना.धनजंय मुंडे,आ.सुरेश धस,गेवराई मतदार संघाचे आ.लक्ष्मण पवार,माजलगांवचे आ.प्रकाश सांळूके,आष्टी मतदार संघाचे आ.बाळासाहेब आजबे,
माजी आ.भीमराव धोंडे,माजी आ.अमरसिंह पंडीत,माजी आ.आर.टी.देशमुख,माजी आ.केशव आंधळे विजयसिंह पंडीत,
भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के,रमेश आडसकर,अक्षय मुंदडा,
यांच्यासह आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
पुढे बोलतांना पंकजा मुंडे म्हणाल्या,जिल्ह्यात जाती-पातीच्या राजकारणाला कधीही थारा मिळाला नाही.सर्वांवर स्व.मुंडे साहेबांची दृष्टी होती.आता सर्वांनी माझ्यावर कृपादृष्टी करावी असे आवाहन करत मला लोकसभेत पाठविल्यास मी भांडून जिल्ह्याच्या विकासासाठी भरपूर मोठ्या प्रमाणावर निधी आणेल तसेच यावेळेस मला निवडून द्या पुढच्यावेळेस तुम्ही ज्यांना म्हणताल त्यांना आपण मतदान करावे असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.
ना.धनजंय मुंडे म्हणाले,हि लोकसभेची निवडणूक बीड जिल्हाने दरवेळेस प्रामाणिक पणे संभाळंली आहे.या बीड जिल्ह्याने आदर्श निर्माण केला आहे.ब्राम्हण समाज,धनगर समाज,माहेश्वरी समाज,मराठा समाज क्रांतीसिंह नाना पाटील,तेली समाज या समाजाला बीड जिल्हाने खासदार निवडून दिले आहेत.तुम्हा सगळ्यांना व प्रितम ताईला हि निवडणूक मोकळी वाटत असेल पण मला जिल्ह्याचा आणि घरचा पालक म्हणून मला सोपी वाटत नाही.समोरच्या उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्या उमेदवारांला छञपती शिवाजी महाराजांची शपथ खावी लागली की मॅनेज उमेदवार नाही.मी त्यांना पक्ष सोडण्याच्या आगोदर आचारसाहिंता लागायच्या आत की त्यांच्या दोन्ही कारखान्यांची मुदतवाढ करून दिली आणि त्यांनी त्यांचे रंग दाखविले.स्व.मुंडे साहेबांनी रजनी पाटील,जयसिंगराव गायकवाड यांना खासदार तर आमदार सुरेश धस,प्रकाश दादा,अमरसिंह पंडीत यांना आमदार केले आहे.मराठा समाज आरक्षणाचा मुद्दा गाजत असतांना सध्याच्या उमेदवाराने ह्या आरक्षणाचा फायदा जर कुणी घेतला असेल तर तो दोन कारखान्याचे मालकाने आगोदर कुणबी प्रमाणपञ घेतले.आणि लगेच निवडणूकीसाठी वापरून फायदाही करून घेतला.पण आत्ता पर्यंत कधीही आरक्षणाचा ब्र शब्द न काढणारा हा नेता सगळ्यात आगोदर कुणबी प्रमाणपञ काढणारा हा नेता म्हणे मी गरीब उमेदवार आहे.प्रितम ताईच्या काळात जिल्ह्यात रस्ते चांगले झाले पण त्यावर अपघातात माणसे गेली त्यांची जबाबदारी घेता का?पण यातील निम्मे रस्ते हे आरोप करणा-या समोरच्या उमेदवारानेच केले.केंद्रात ताईंची उठबस मोठी आहे पुढच्या पाचच वर्षात पुढील पन्नास वर्षाचा विकास होईल.रेल्वेतर सुरू होईलच पण परळी ते मुंबई वंदेभारत रेल्वे सुरू होण्यासाठी प्रयत्न ताई करतील.आणि हि निवडणूक कोणीही हालक्यात घेऊ नये असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.


खा.डाॅ.प्रितम मुंडे म्हणाल्या,आज पंकजा मुंडे यांची खासदार म्हणून हि विजय सभा झाली आहे.जो ताई बोलेंगे वही मै करूंगी,स्वत;उमेदवार नसतांना प्रचार करतांना जी मज्जा आहे ती उमेदवार असल्यावर जमत नाही.त्यावेळी आपल्यावर दडपण असते.ताईंनी जे सत्तेच्या काळात काम केले त्यावर मान्यवरांनी सांगीतले.आता पंकजा ताईंना त्यांना योग्य ठिकाणी बसविण्याची संधी जिल्हावासियांना मिळाली आहे.मी विजयाची सभा या मुळे म्हणाले की आजचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी नुसते बीड जिल्ह्यातीलच नाही तर नगर,पुणे,नाशिक,बुलढाणा यासह इतर जिल्ह्यातून कार्यकर्ते याठिकाणी आले असल्याने मी विजय सभा म्हणाले असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार सुरेश धस म्हणाले,सध्या निवडणूकीत फक्त पंकजा मुंडे यांना विजय करायचे ठरविले आहे.पुढच्या निवडणूकीत जे होईल ते होईल त्याचा विचार आता करायचा नाही.आता फक्त अबकी बार ४०० पार भाजपाने ठरविले आहे.आणि हि घोषणा दिल्यानंतर विरोधकाने जाती जातीत विष पेरण्याचे काम केले.पण आता यांच्या या भूल थापांना बळी पडणार नाही.सध्या मी उध्दव ठाकरेचे भाषण ऐकत असून ते सध्या फक्त मुख्यमंञी एकनाथ शिंदे यांच्यावर भाषण करतात.आणि हि निवडणूक देशाची आहे साहेब,तुम्ही भाजपा बरोबर नांदायचे सोडून पंजा,घडाळ्यावर बरोबर संसार केला हे बरोबर आहे का?अडीच वर्षाच्या सत्तेच्या काळात एकही काम केले नाही.तसेच मराठा समाजाला आरक्षण भेटले पाहिजे आणि सग्या सोयरांचा आदेशही लागू करण्यासाठी आम्ही या आगोदर आणि येथून पुढे ही विधान भवनात प्रश्न मांडणार असल्याचे ग्वाही आ. धस यांनी दिली.सन २०१४-२०१९ काळात पंकजा मुंडे यांनी गाव,वाडी,वस्तीवर २५-१५ मधील कामे काय असतात याची माहिती जिल्हावासियांना करून दिली आहे.सत्तेच्या काळात त्यांनी मोठ्या प्रमाणावर कामे जात-पात न पाहता केली असल्याचे आमदार धस यांनी सांगीतले.आष्टी मतदार संघाचे आ.बाळासाहेब आजबे म्हणाले,सध्या समाजात विष कालविण्याचे प्रकार चालू आहे.आरक्षण मिळावे यासाठी कोणताही नेता विरोधात नाही.सरकारने विशेष अधिवेशन घेऊन १०% आरक्षण मराठा समाजाला दिले आहे.आणि हे दिलेले आरक्षण १००% कोर्टात टिकले पाहिजे हा सरकारचा प्रयत्न सुरू असतांना माञ खालच्या थरावर वेगळीच चर्चा सुरू आहे.हे कुठेतरी थांबले पाहिजे आणि हे कार्यकर्त्यांनी समजून घेतले पाहिजे.बीड जिल्हाचा विकास करण्यासाठी पंकजा मुंडे यांना मोठ्या मताने निवडूण आणून आपल्याला केंद्रात मंञी म्हणून आपला माणूस पाठवा यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहनही आ.आजबे यांनी केले.आ.लक्ष्मण पवार म्हणाले,हि निवडणूक जाती पातीची होणार नाही.गेल्या पंधरा वर्षात झालेला बदल जिल्हावासियांनी पाहून मतदान करून पंकजा मुंडे यांना मोठ्या माताधिक्याने विजय करावे असे अवाहन त्यांनी केले.आ.प्रकाश सोळूंके म्हणाले,महायुतीच्या उमेदवाराची तुलना केली तर आपला उमेदवार कार्यक्षम,अनुभवी असून,सर्व जिल्याने आता ठरविले आहे की,मोठ्या मताने निवडून देण्याचे ठरविले असून आता जिल्ह्याच्या विकिसासाठी एकजूटीने लढण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच महायुतीच्या भाजपा,शिवसेना,राष्ट्रवादी काॅग्रेस,मनसे यासह सर्व घटक पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी पंकजा मुंडे यांचा सत्कार केला.कार्यक्रमाचे प्रस्ताविक राजेंद्र म्हस्के यांनी केले.यावेळी माजी आ.भिमराव धोंडे,रमेश आडसकर, सावता परिषदचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे,रासप नेते बाळासाहेब दौडकर,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमंत धस,बंजारा समाजाचे नेते पी.टी.चव्हाण, अल्पसंख्याक समाजाचे नेते सलिम जहाॅगीर,शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख अनिल जगताप,या नेत्यांची भाषणे झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.