बायको नटली म्हणून,डोक्यात कु-हाड घातली;नव-याने केली आत्महत्या
click2ashti update-“शिराळाच्या दिवशी का नटलीस?”असे म्हणत कुऱ्हाडीने घावघालून जिवे मारण्याचाप्रयत्न केला.बायको बेशुद्धपडली असताना मृत झाली असे गृहीत धरून नवरानेस्वतःघरातील पत्र्याच्या लाकडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवार (दि.१०)रोजी सकाळी घडली.सीताराम म्हात्रे (४२) असे मृत पतीचे नाव असून सुनीता म्हात्रे (३५) असे जखमी पत्नीचे नाव आहे.
नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी श्रीयाळराजाच्या स्मरणार्थ सर्व महिला मातीचेशिराळ बनवून त्याभोवती गाणे म्हणत असतात.या दिवशीच जिल्ह्यातील ल्याहारी (ता.हादगांव) येथील पती सीताराम म्हात्रेयाने पत्नीशी वाद घातला.’तू का नटलीस?’म्हणत मारहाण करण्यास सुरुवात केली. हातात कुऱ्हाड घेऊन तिच्यावर सपासप वारकेले.या त्याच्या अचानक झालेल्या वारामुळेसुनीता सीताराम म्हात्रे ही बेशुद्ध पडली.ती मृत झाली असे गृहीत धरून त्यानेसुद्धाघरातीलच दोरी घेऊन पत्राखालील लाकडाला दोर बांधून गळफास घेतला आणिआपली जीवनयात्रा संपवली.या हल्ल्यात सुनीता म्हात्रे ही मृत झाली नव्हती,तर गंभीर जखमी झाल्याने बेशुद्ध पडली होती. थोड्या वेळानंतर ती शुद्धीवर आल्यावर रांगत रांगत बाहेर गेली आणि रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना बोलावले.शतिची अवस्था पाहून इतर लोकांसोबतच सरपंच गणेश माधवराव बोईनवाड यांनी पळत जाऊन धीर दिला.पाणी पाजले.आपल्या गाडीतून दवाखान्यात नेऊन पुढीलउपचार केले.त्यात तिचा जीव वाचला.सध्या महिलेची प्रकृती स्थिर आहे.