सत्तेच्या काळात मतदारसंघा ऐवजी,कुटूबांचा व नातेवाईकांचा विकास करणारे विद्यमान आमदार होय-माजीमंत्री सुरेश धस
आमदार आजबे व माजी आमदार धोंडे यांच्यावर हल्लाबोल
click2ashti update-“माझा मतदार संघ,माझे नातेवाईक” या म्हणीप्रमाणे फक्त पुतण्या,जावाई आणि मेव्हणा यांनाच कामे देऊन आपला आणि आपल्या कुटुंबांचा विकास करणारे आमदार मतदार संघाला लाभले आहे.कोरोना काळात तालुक्यात सर्वात जास्त मृत्यूची संख्या ही विद्येमान आमदार यांच्या शिराळ गावाची होती.जर हे संकटात आपले गाव संभाळु शकले नाहीत.आणि आता निवडणुका जवळ आल्यावर खोट्या विकास कामांच्या मनानेच घोषणा करित असल्याचा आरोप माजीमंत्री सुरेश धस यांनी केला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कडा जिल्हा परिषद गटाची शुक्रवार दि.16 रोजी दुपारी 2 वा.आयोजित करण्यात आलेल्या जनसंवाद दौऱ्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना माजीमंत्री सुरेश धस बोलत होते.याबैठकीस कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रमजान तांबोळी,संदीप खाकाळ,सरपंच युवराज पाटील, डॉ.आंबेडकर सोशल फोरमचे जिल्हाध्यक्ष यशवंत खंडागळे,संजय आजबे यांच्यासह आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.पुढे बोलतांना माजीमंत्री धस म्हणाले,मी १९९९ लाख आमदार झाल्याच्या नंतर आमच्या घरची गुत्तेदारी बंद झाली गुत्तेदारीचे रजिस्ट्रेशन सुध्दा रद्द झालं हे नम्रपणे सांगतो.सध्या जे मतदार संघात काय चालले बघा पेवहिंग ब्लॉक,सिमेंट भी तुम्ही सांगाल तिथूनच घ्यायचं,वाळू पण तुमचीच,डांबर प्लॅट तुमचा जसे करोना काळात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझे कुटुंब,माझे जबाबदारी ह्या घोषणेप्रमाणे येथील आमदार माझाच मतदारसंघ,माझे कुटुंब म्हणजे मी,माझा पुतण्या,जावई आणि उर्वरित राहिलेला आमदार साहेबांचा मेव्हणा या पलीकडे मतदारसंघाची व्याख्या मला वेगळी काहि दिसत नाही.तसेच सन २०१४ ला माझा पराभव झाला. त्यानंतर धोंडे साहेब तुम्ही निवडून आले.त्यांच्या पाच वर्षात त्यांनी ज्या योजना वरती तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते नारळ फोडला ती खुटेफळ ते मेहकरीची योजना मी स्वतःआणून माझ्याच कार्यकाळात 97% काम पुर्ण केले असल्याचेही धस यांनी सांगितले.यावेळी उपसरपंच दिपक कर्डीले,माजी उपसरपंच बाळासाहेब कर्डीले,संपत सांगळे,अनिल ढोबळे, संजय ढोबळे,बाळासाहेब कर्डीले,संजय मेहेर,अजित घुले, मधुकर गिऱ्हे,सचिन घावटे,सुनील देशमुख,सय्यद अन्सार, राम मधूरकर,रतिलाल कटारिया,अशोक ढवन,काकासाहेब थेटे,संजय आजबे,कुमार जाचक,छगन कर्डीले,भाऊसाहेब भोजने,रमेश भोजणे,योगेश भंडारी,बिपीन भंडारी,जयंत खंदारे,गोविंद मिश्रा,अशोक राजपूत,गोरख कर्डीले,नागेश कर्डीले,संपत कर्डीले,दीपक कर्डीले,महेश कराळे,सतीश कर्डीले,बंडू सय्यद,राजाबपू कर्डीले,सागर खेडकर,दासा शिरोळे,संतोष भंडारी,राजू गावडे,विजय वेदपाठक,संतोष ओव्हाळ,सुभाष ढोबळे,राम धुमाळ,शैलेश गांधी,सुभाष घावटे,रमेश देशमुख,महेश घोलप,ऋषिकेश कर्डीले,परमेश्वर कर्डीले,महेश खाकाळ,अशोक पवळ,राजू पावाळ,वर्धमान धुमाळ,नाना आऊटे,नानासाहेब काळे,विजय ढोबळे, धैर्यशील पाटील,श्रीकांत कर्डीले,गौतम आजबे,शेरु नलावडे,मनोहर सरोदे,हनुमंत सावंत ,दत्तभाऊ खिळे,राजू शिंदे,राहुल कर्डीले,सचिन पोकळे,अनिल शिंदे,बंडू शिंदे,पप्पू घावटे,शेख इब्राहिम,बंडू ढोबळे,चंगुने महाराज,अमोल साळवे,सुधीर ढोबळे,शेख आरिफ,विष्णू कुसळकर,मयुर नलावडे,दादा थोरवे,राहुल गोरे,कुंडलिक कर्डीले,सुनील आष्टेकर,सागर ढोबळे,विकास मेहत्रे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.