“जनसन्मान यात्रेचा” गुरुवारी आष्टीत उपमुख्यमंत्री “अजित पवार” यांच्या उपस्थितीत मेळावा-आ.आजबे
मतदार संघातील शेतकरी,महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहाण्याचे आवाहन
click2ashti update-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या जनसन्मान यात्रेचे गुरुवार (दि.29) दुपारी तीन वाजता
आष्टी शहरात जंगी स्वागत करण्यात येणार आहे.त्यानंतर मोरेश्वर मंगल कार्यालयात शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे.या मेळाव्याला आष्टी,पाटोदा,शिरूर विधानसभा मतदार संघातील शेतकरी,महिला,युवक-युवतींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन मतदार संघाचे आ.बाळासाहेब आजबे यांनी केले आहे.
आष्टी येथील बाळासाहेब आजबे संपर्क कार्यालयात मंगळवार (दि.27)रोजी सकाळी 11 वा.आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आ.आजबे बोलत होते.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी(अजित पवार गट) चे तालुकाध्यक्ष काकासाहेब शिंदे यांच्यासह आदि उपस्थित होते.पढे बोलतांना आ.बाळासाहेब आजबे म्हणाले,लाडकी बहिण योजनेने खेड्यातील गोर-गरीब कुटूंबीयांना या योजनेने आधार मिळाला आहे.हि योजना कायम स्वरूपी टिकणारी असल्याचेही आ.आजबे यांनी सांगितले.तसेच या मेळाव्याला उपमुख्यमंत्री अजित पवार,प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे,माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल हे मार्गदर्शन करणार आहेत.या मेळाव्याला आष्टी,पाटोदा,शिरूर विधानसभा मतदार संघातील शेतकरी,महिला,युवक-युवतींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन मतदार संघाचे आ.बाळासाहेब आजबे यांनी केले आहे.