व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

कॅमेरे बंद करण्याच्या अटीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांची “मराठा”आंदोलकांशी चर्चा

0

click2ashti update-आष्टी येथे जनसन्मान यात्रेचा कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार गुरुवार (दि.२९) रोजी दुपारी तीन वा.आष्टीत दाखल झाले.या वेळी निवेदन देण्यासाठी त्यांना मराठा बांधवांनी आरक्षणाबाबत जाब विचारला.निवेदन स्वीकारताना पवारांनी आधी कॅमेरे बंद करावे,अशी अट घातली. कॅमेरे बंद केल्यानंतर त्यांनी मराठा आंदोलकांशी चर्चा केली.ओबीसीतूनच मराठा आरक्षण द्यावे,अशी मागणी आंदोलकांनी केली.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जनसन्मान यात्रेचा कार्रक्रम आटोपून मंगल कार्यालयातून हेलीपॅडवर निघाले असता येथील राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनास भेट देण्यासाठी थांबले.याठिकाणी सकल मराठा समाजाच्यावतीने आरक्षणाबाबत निवेदन देण्यात आले.यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कॅमेरा बंद करण्याच्या अटीवर आंदोलकांशी चर्चा केली.यावेळी ते म्हणाले,आम्ही सर्व समाजाला न्याय देण्याचे कामे करतोय. त्यासाठी मराठा,ओबीसी,दलित,मुस्लिम यांच्यासाठी महामंडळ स्थापन केले.जातीपाती,नातीगोती यांचा विचार करायचा नाही,तर सर्वांना समान न्याय द्यायचा. आरक्षणाच्या बाबतीत कुणाचाच कुणाला विरोध असण्याचे कारण नाही,मी मराठा समाजाच्या सर्व मागण्यासाठी सहमत असाल्याचेही त्यांनी सांगितले.यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे,आमदार बाळासाहेब आजबे यांच्या मराठा अंदोलक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे दिले आदेश
आष्टी तालुक्यातील खडकत येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविल्या ने आष्टी पोलिसांनी जाणुन-बुजून
मराठा समाजातील शिक्षण घेत असलेल्या मुलांवर गुन्हा दाखल केल्याचे आंदोलकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सांगताच पवार यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक यांना भ्रमणध्वनीवरून गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.