पाणि प्रश्न कायमचा मार्गी लावण्यासाठी आमदार आजबेंना पुन्हा विधानसभेत पाठवा-उपमुख्यमंत्री अजित पवार
आष्टीत जनसन्मान यात्रेचे जंगी स्वागत
click2ashti update-गेल्या पाच वर्षात आमदार आजबे यांच्या चिकाटीने मतदारसंघासाठी सुमारे तीन हजार कोटी रुपयांचा निधी या सरकारने दिला आहे.आता पुन्हा या मतदारसंघातील राहिलेला महत्वाचे असलेला उजनीचे चार टिएमसी पाणी खुंटेफळ साठवण तलावासह इतर प्रश्न व कामे पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या निवडणुकीत घडाळ्यासमोरील चिन्ह दाबून बाळासाहेब आजबे यांना पुन्हा विधानभवनात पाठवण्याची जबाबदारी तुमची बाकी विकास करायची जबाबदारी माझी असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

अजित पवार यांची जनसन्मान यात्रा गुरुवार (दि.२९) रोजी दुपारी आष्टी येथे आली होती.यावेळी झालेल्या जाहीर सभेत पवार बोलत होते.यावेळी व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, पालकमंत्री धनंजय मुंडे,महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर,सुरज चव्हाण,आमदार बाळासाहेब आजबे,माजी बीड जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.शिवाजी राऊत,आष्टी तालुका अध्यक्ष काकासाहेब शिंदे,विश्वास नागरगोजे,दीपक घुमरे,सतीश शिंदे,विठ्ठल सानप,दशरथ वनवे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.पुढे बोलतांना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले,लाडक्या मी सन्मान यात्रा काढण्यापूर्वी सहा हजार कोटी रुपयांच्या फाईलवर सही करून आलो आहे.१७ ऑगस्टला लाडकी बहिण योजनेत पात्र महिला,भगिनींच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये जमा होतील.यामागे केवळ आर्थिकदृष्ट्या महिला सक्षम झाल्या पाहिजेत असे नाही,तर त्यांना स्वयंनिर्णयाचा अधिकार मिळावा,या हेतूने योजना सुरू केली.त्यासाठी पैशाची कमतरता नाही,त्यामुळे ही योजना बंद पडणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.तसेच बहिणी साठीच नाही,तर भाऊ पण लाडका आहे.त्याच्यासाठी वीज बील माफ करण्याचा निर्णय घेतला.मागचे बील भरायचे नाही,पुढचे बील येणारच नाही.सोलारवर ९ हजार मेगावॅट वीज निर्मिती केली जाणार आहे.त्यानंतर शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळेल.मुलांसाठी स्टायपंडची योजनाही आणली आहे.नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहेत.चंद्राबाबू नायडू आणि नितीशकुमार यांनी त्यांना पाठिंबा दिल्यामुळे त्यांच्या राज्याला झुकते माप मिळाले.त्यामुळे आपल्याला महाराष्ट्राचा विकास करून घ्यायचा असेल,तर केंद्रात आणि राज्यात एका विचाराचे सरकार आणावे लागेल.विरोधकांच्या खोट्या-नाट्या प्रचाराला बळी पडू नका.लोकसभेत जे घडले,ते विधानसभेत होऊ देऊ नका.आम्ही शब्दाचे पक्के आहोत,महायुतीचे सरकार राज्यात परत येणारच आहे,त्यानंतर राज्याचे उर्वरित प्रश्न केंद्र सरकारच्या मदतीने सोडवून विकास करू.प्रारंभी आ.आजबे म्हणाले,अजित पवार मुख्यमंत्री करण्यासाठी आपला मोलाचा वाटा असला पाहिजे.अजित पवार यांच्या माध्यमातून पश्चिमेचे पाणी पूर्वेला वळवण्यासाठी आपल्याला मदत होईल.त्यांच्यासारखा दुसरा नेता नाही.त्यांच्याकडून मतदार संघाचा विकास करण्यासाठी पाच वर्ष मी त्यांना खूप त्रास दिला.त्यांच्यामुळे आष्टी मतदार संघाला तीन हजार कोटींचा निधी मिळाला.

विकासकामांच्या बाबतीत बाळासाहेब यांची तळमळ
मी पहाटे पाचला उठून सहा वाजता कामाला लागतो.बाळासाहेब कामासाठी मला उठवायला येतो.विकास कामाबाबत त्याची तळमळ माझ्या सारखीच आहे.त्याचे प्रत्येक काम मी करतो.यापुढेही करीत राहिल.तुमच्या मतदार संघाचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवायचा आहे.त्यासाठी येणा-या निवडणूकीत तुम्ही पुन्हा बाळासाहेब यांना विधानसभेत पाठवा मी निधी कमी पडू देणार नाही,असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
बातमी मधील सर्व छायाचित्रे-गोपाळ वर्मा