आ.आजबेंनी रुग्ण सेवेला खोडा घालण्याचा प्रयत्न करू नये-माऊली जरांगे
माझे माणसं घ्या म्हणत रुग्णसेवेला ब्रेक लावणे म्हणजे निव्वळ बालीशपणाचे लक्षण
click2ashti update-नुकतेच कुसंळब येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन होऊन लोकार्पण झाले.यामुळे कुसंळबसह परिसरातील नागरिकांना योग्य तो आरोग्य सेवेचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली.ही आरोग्य सेवा आजतागायत अविरतपणे नित्यनियमाने सुरू आहे.मात्र विद्यमान लोकप्रतिनिधी असलेल्या बाळासाहेब आजबे यांनी या रुग्णालयात माझे माणसं घेत नाहीत.म्हणून रुग्णसेवेला ब्रेक लावणे म्हणजे निव्वळ बालीशपणा आहे.स्वत:लाख कर्तव्यदक्ष समाजणा-यां या लोकप्रतिनिधी चे हे रुग्णालय उभारणी साठी योगदान तर शून्य आहे.शिवाय काही त्यांच्या चेले चपाट्यांना हाताशी धरून काही दिवसांपासून या रुग्णसेवेला खिळ घालण्याचा प्रयत्न करून नियमित सुरू असलेली सेवा खंडित करण्याचा अट्टाहास दिसून येत आहे. त्यामुळे आता तरी हा रातराणीचा खेळ विद्यमान लोकप्रतिनिधींकडून थांबविला गेला पाहिजे अन्यथा हे रुग्णालय आजबे यांनी आपल्या कार्यकाळात पूर्ण कसे होणार नाही.याचा केलेला केविलवाणा प्रयत्न आगामी काळात जनतेसमोर आणला जाईल असा इशारा माजी जिल्हा परिषद सदस्यपती माऊली जरांगे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्राद्वारे दिला आहे.
यावेळी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात जरांगे यांनी विद्यमान लोकप्रतिनिधी बाळासाहेब आजबे यांच्याकडून कुसळंब येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मंजुरीपासून ते पूर्णत्वास येईपर्यंत अनेक अडथळे निर्माण केल्याचे म्हटले आहे.या रुग्णालयाचे बांधकाम सुरू असताना त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यामार्फत जो आता स्वतः मतदार संघाचे लोकप्रतिनिधी होण्याचे स्वप्न पाहत आहेत.त्याच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामाची तक्रार दाखल करून ते रोखण्याचा केविलवाणा प्रयत्न केला होता. परंतु सदरील कामाचा दर्जा योग्य असल्याने प्रशासनाने त्यांचा बालिश प्रयत्न हाणून पाडला.तदनंतर अनेकवेळा अशाच प्रकारे या ना त्या कारणाने या रुग्णालयाच्या उभारणीस अडथळे निर्माण कसे होतील यासाठी मुंबई वारी करत अनेक प्रयत्न केले.

मात्र त्यांच्या या कुत्सित भावनेला कुणीच जुमानले नसल्यामुळे आणि मी करत असलेले काम हे प्रामाणिक आणि रुग्णसेवेला वाहून घेणारे असल्याने हे रुग्णालय पूर्णत्वास आले.शिवाय या रुग्णालयाच्या जमीन हस्तंतरणापासून ते संपूर्ण इमारत उभी होईपर्यंत आमचे नेते माजी मंत्री सुरेश धस यांनी दिवसरात्र शासन दरबारी पाठपुरावा करून ग्रामीण भागातील सर्वसामान्य आणि गोरगरीब जनतेसाठी ही आरोग्यसेवा खुली करण्याचे पुण्यांचे काम केले आणि ही दिमाखदार इमारत ५ ऑगस्ट रोजी लोकार्पण करत खुली करण्यात आली.मात्र या सर्व कामात आपल्याला तसूभरही श्रेय मिळत नसल्याचा राग मनात धरून विद्यमान लोकप्रतिनिधी असलेल्या आजबे यांच्या चेले चपाट्यांनी या अविरत सुरू असलेल्या रुग्ण सेवेला खिळ घालत रुग्णालयाची रुग्ण सेवा बंद करण्याचा केविलवाणा प्रयत्न चालू असून शिवाय गुण्या गोविंदाने नादनारे कुसळब गावात जातीय तेढ निर्माण करून वातावरण दूषित करण्याचाही प्रयत्न केला गेला आहे.त्यामुळे असे कृत्य देखील होता कामा नये.म्हणून माझी विद्यमान लोकप्रतिनिधी असलेल्यांना विनंती आहे की,हा बालिशपणा तात्काळ थांबवा अन्यथा मला तोंड उघडायची वेळ आली तर तुमचा असलेला भोंगळ कारभार जनतेसमोर आणावा लागेल असा इशाराच शेवटी जरांगे यांनी दिला.
राजकीय स्वार्थासाठी कुणी गावातील सलोख्याचे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करू नये
आदर्श गाव म्हणून कुसंळब हे गाव आहे.ग्रामदैवत खंडोबाच्या कृपेने या गावाने विकास कामात गती घेतली आहे.मात्र राजकीय स्वार्थासाठी कुणी गावातील सलोख्याचे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत असेल तर अशा प्रवृत्तींना गावातील जनता कदापी थारा देणार नाही.
–शिवाजी पवळ,कुसळंब ग्रामस्थ
आम्हाला राजकीय दबावतंत्र वापरून डावललं जातंय-चंद्रकांत पवार
आम्ही शेतकऱ्यांनी लाख मोलाची जमीन गावात आरोग्य केंद्र होत आहे आम्ही त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना सेवा मिळेल या उदात्तहेतूने दिली होती.त्यावेळेस कुटूंबातील एका व्यक्तीला या आरोग्य केंद्रात कंत्राटी कर्मचारी म्हणून पदावर घेतले जाईल असा शब्द संबंधित प्रशासनाकडून देण्यात आला होता.मात्र आता यात राजकीय कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.आम्हा शेतकऱ्यांवर अन्याय करण्याचा प्रयत्न होत आहे.त्यामुळे प्रशासनाला आमची विनंती आहे की दिलेल्या शब्दाला जागून आमच्यावर अन्याय करू नका.अन्यथा आम्ही कुटूंबासह आमरण उपोषण करू असा इशारा शेतकरी चंद्रकांत पवार यांनी दिला आहे.