व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

एएससी कंपनीकडून गोरगरीब लोकांचे पैसे परत; अन्यथा सायबर विभागाच्या अधिकाऱ्यांची गृहमंत्र्यांकडे तक्रार करणार-सुरेश धस

https://youtu.be/gq7IMgAsxvw?feature=shared

0
click2ashti update-एएससी या कंपनीने ऑनलाइन व्यवसाय द्वारा मासे विक्री आणि इतर प्रकारचे व्यवसाय अधिक पैसे मिळवण्याचे आमिष दाखवून गोरगरीब,छोटे-छोटे व्यवसायिकांना लुटले असून या व्यवसायिकांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी बीड जिल्हा सायबर क्राईम सेलचे अधिकाऱ्यांनी अधिक कार्यक्षमतेने आणि कठोरपणे कारवाई करण्याची आवश्यकता आहे.अशी जनतेची अपेक्षा असून,त्यानुसार जिल्हा पोलीस दलातील सायबर विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ कार्यवाही करावी अन्यथा या संबंधित अधिकाऱ्यांची तक्रार आपण उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहोत असा इशारा माजी राज्यमंत्री सुरेश धस यांनी दिला .
             
आष्टी पोलीस स्टेशन मध्ये पत्रकारांशी ते बोलत होते.ते पुढे म्हणाले, एएससी या ऑनलाईन कंपनीद्वारे छोट्या व्यवसायिकांना मासे विक्री व्यवसायातून अधिक नफा मिळवण्यासाठी ऑनलाईन पैसे गुंतवण्याचे आमिष दाखवण्यात आले.त्यामध्ये तालुक्यातील १२०० ते १४०० लोकांचे प्रत्येकी ५ ते १० लाख रुपयापर्यंतची गुंतवणूक झाली असून आता त्यांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाली आहे.त्यातील अनेक व्यवसायिकांनी व्याजाने पैसे काढून गुंतवणूक केल्यामुळे आज त्यांच्यावर फाशी घेण्याची वेळ आलेली आहे.त्यामुळे सायबर क्राईम विभागाकडे काळे नावाच्या व्यक्तीने याबाबत रितसर  फिर्याद दाखल केली असून त्या फिर्यादीनुसार संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी.आणि या गोरगरीब व्यवसायिकांचे पैसे मिळवण्यासाठी बीड जिल्हा पोलीस दलातील सायबर क्राईम विभागाच्या अधिकाऱ्यांनी अधिक कार्यक्षमते आणि प्रामाणिकपणे काम करण्याची आवश्यकता आहे असे सांगत ते म्हणाले की,बीड जिल्ह्यातील महादेव ॲप या महा घोटाळ्यातील नऊ नऊ अब्ज रुपये ज्या व्यक्तींच्या नावावर आर्थिक व्यवहार झालेला आहे त्या व्यक्तींपैकी अनेक जण उजळ माथ्याने फिरत आहेत.त्यांच्यावर सायबर विभागाच्या अधिकाऱ्यांची मेहरबानी दिसून येत आहे.सायबर विभागातील एक अधिकारी अनेक दिवसांपासून त्या ठिकाणी कार्यरत असून त्याची माहिती मी घेत आहे.या गोरगरीब जनतेची फसवणूक करणाऱ्या व्यक्तींचा शोध होऊन त्यांना त्यांचे पैसे परत मिळवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्यात यावेत अन्यथा.या सायबर विभागातील अधिकाऱ्यांची आपण राज्याच्या गृहमंत्र्याकडे तक्रार करणार आहोत असेही त्यांनी शेवटी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.