व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

कुंडीमध्ये बाप्पाचे विर्सजन करा अन् हिरवेगार एक वृक्ष मिळवा;नगर पंचायत व धनश्री पतसंस्थेचा उपक्रम

0

click2ashti update-पर्यावरणपूरक वातावरणामध्ये गणपती बाप्पाचे विसर्जन व्हावे ही काळाची गरज आहे.ज्या मनोभावे बाप्पांचे आगमन आणि दहा दिवस गणेशोत्सव साजरा झाला त्याच भक्ती भावाने विसर्जन कुंडामध्ये गणपती बाप्पाचे विसर्जन करणाऱ्या-नागरिकांना नगर पंचायत आष्टी व धनश्री पतसंस्थेच्या वतीने आपल्या घरासमोर लावण्यासाठी एक वृक्ष देण्यात येणार आहे.
पर्यावरणपूरक श्री गणपती उत्सव व माझी वसुंधरा अभियानांतर्गत आष्टी नगर पंचायत आणि धनश्री पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने धनश्री पतसंस्थाच्यावतीने भाजी मंडई येथे घरगुती गणपती विसर्जन करण्याकरिता भव्य विसर्जन कुंडाची निर्मिती करण्यात येणार आहे.या विसर्जन कुंडामध्ये नागरिकांनी आपल्या घरगुती गणपती बाप्पांचे विसर्जन १७ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते ४ च्या
दरम्यान करण्यासाठी योजना तयार केली आहे.पर्यावरणपूरक वातावरण तयार करण्यासाठी विसर्जन करणाऱ्या प्रत्येक नागरिकांना एक वृक्ष भेट म्हणून देण्यात येणार आहे.भविष्यात प्रत्येक नागरिकांच्या घरासमोर एक वृक्ष असावे व उन्हाळ्यात नागरिकांच्या घरासमोर वृक्षाची सावली सुद्धा असेल व शहर हिरवेगार होईल ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून हा अभिनव उपक्रम राबवण्यात येणार आहे.
शहर हिरवेगार हाच उद्देश-रंगनाथ धोंडे
शहर हिरवेगार व्हावे हाच संस्थेचा उद्देश गेल्या अनेक वर्षापासून धनश्री पतसंस्थेच्या माध्यमातून शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करून संभाळ पण केला आहे.परंतु हे फक्त संस्थेनेच काम न करता नागरीकांनीही यामध्ये सहभागी व्हावे,आणि संपूर्ण शहर हिरवेगार व्हावा हाच उद्देश या मागचा आहे.
रंगनाथ धोंडे,अध्यक्ष धनश्री पतसंस्था आष्टी
वृक्ष रुपी दान आपल्या घरासमोर लावावे-मुख्याधिकारी
श्री गणपती बाप्पांचे विसर्जन करण्याकरिता सार्वजनिक विसर्जन कुंडतयार करण्याचा उपक्रम सुरू आहे. यासोबतच गणपती बाप्पाला वाहिलेले हार-फुले नदीमध्ये न टाकता विसर्जन कुंडाच्या ठिकाणी असलेल्या निर्माल्य कलश मध्ये टाकावे जेणेकरून त्यापासून पर्यावरणाला पूरक अशा कंपोस्ट खताची निर्मिती करता येईल.सदर विसर्जन कुंडामध्ये आपल्या घरगुती गणपती बाप्पांचे विसर्जन करण्याकरिता जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवावा व मिळालेले वृक्ष रुपी दान आपल्या घरासमोर लावून शहर हिरवेगार करण्यासाठी हातभार लावावा असे आवाहन नगरपंचायत मुख्याधिकारी ऋतुजा पाटील यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.