व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

तालुक्यातील १०९ ग्रामपंचायत उमेदवारी अर्जाची सोमवारी छाननी-तहसिलदार विनोद गुंड्डमवार

सकाळी ११ वा.होणार आयटीआय महाविद्यालयात सुरूवात

0

आष्टी-तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटच्या दिवशी शुक्रवारी इच्छुक उमेदवारांची झुंबड उडाली होती.आतापर्यंत सरपंचपदाच्या १०९ जागांसाठी ७४५ तर सदस्यपदांसाठी ३ हजार ९६१ अर्ज दाखल झाले आहेत.उद्या सोमवार दि.५ रोजी सकाळी ११ वा. उमेदवारी अर्जांची छाननी होणार असल्याची माहिती तहसिलदार विनोद गुंड्डमवार यांनी दिली.
तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतींच्या १८ डिसेंबर रोजी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी २८ नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज स्वीाकरण्यास प्रारंभ झाला.उमेदवारी अर्ज ऑनलाईन भरणे बंधनकारक असल्यामुळे इच्छुक उमेदवारांची कॅफेवर गर्दी झाली.
परंतु सर्व्हर सातत्याने बंद पडत असल्याने निवडणुकीपासून वंचित राहावे लागेल अशी भीती निर्माण झाली होती.मात्र, निवडणूक आयोगाने उमेदवारी अर्ज ऑफलाईन भरण्यास मुभा देत दिलासा दिला. त्यामुळे गुरुवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास वेग आला.त्यामुळे गुरूवार तिसर्‍या दिवसापर्यंत सदस्यपदासाठी ८७९ तर सरपंचपदासाठी १९१ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. निवडणूक आयोगाने साडेपाच वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्यास मुभा दिली.त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी इच्छुकांची झुंबड उडाली होती.महिलांसाठी 50 टक्के जागा असल्याने, महिलांही मोठ्या संख्येने अर्ज दाखल करण्यासाठी आल्या होत्या.तालुक्यातील कडा,धानोरा,धामणगांव,लोणी,या मोठ्या गावांतील इच्छुकांनी समर्थकांसह आयटीआय महाविद्यालयात गर्दी केली होती.या गर्दीला आवर घालण्यासाठी शेवटी तहसीलदार विनोद गुंड्डमवार यांना पोलिसांची मदत घ्यावी लागली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.