अंबाजोगाईजवळ अपघात; लातूरचे चार ठार
बीड click2news अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर फाट्याजवळ आज रविवारी पहाटे कंटेनर आणि कारचा भीषण अपघात झाला असून यात लातूर जिल्ह्यातील चार जण जागीच ठार झाले आहेत. हे सर्वजण कारमधून छत्रपती संभाजीनगरकडे निघाले होते. हा अपघात आज पहाटेच्या सुमारास घडला.
लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील जगलपूर येथील चार जण (अद्याप नावे समजू शकली नाही) िस्वफ्टने (एमएच 24 एएस 6334) काही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगरकडे निघाले होते. रविवारी रात्री एक ते दीडच्या सुमारास अंबाजोगाई लातूर रोडवर बर्दापूर जवळील पाचपीर दर्गा जवळ कार आणि समोरुन येणाऱ्या कंटेनरची (एमएच 12 एमव्ही 7188) ची जोरात धडक झाली. या अपघातात कारमधील चौघे जागीच ठार झाले. घटनेची माहिती मिळताच र्दापूर पोलीस ठाण्याचे एपीआय ससाणे, पीएसआय यादव, सहा. फौजदार बिडगर, हेड कॉन्स्टेबल शेख, कर्मचारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सर्व मृतदेह अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहेत.