व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

पंधरा दिवसात शेतकऱ्यांचे वीज बिल नील करणार : अजित पवार

0

सोलापूर click2ashti उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यभर जनसन्मान यात्रा काढली असून ही यात्रा रविवारी मोहोळ (जि.सोलापूर) येथे दाखल झाली होती. यावेळी आयोजित सभेत अजित पवार यांनी पंधरा दिवसात शेतकऱ्यांचे वीज बिल नील करणार असल्याची घोषणा केली. आगामी विधानसभा निवडणुकीत तुम्ही महायुतीचे सरकार आणल्यास सरकारच्या पाच वर्षांच्या काळात शेतकऱ्यांचे वीज बिल पूर्णपणे माफ करणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
मोहोळ येथील सभेत उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, मी मंत्री असलो तरी शेती आणि शेतकऱ्यांची जाण मला आहे. शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी महायुती सरकार कायम प्रयत्नशिल आहे. शासनाने शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या असून अनेक शेतकऱ्यांना योजनांचा लाभही मिळाला आहे. येत्या पंधरा दिवसात राज्यातील शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करणार असून हे मी निवडणुका आल्यात म्हणून सांगत नाही तर हा दादाचा वादा आहे असे पवार म्हणाले.महायुतीचे सरकार आणल्यास पुढील पाच वर्ष बिल द्यावे लागणार नाही असेही पवार म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.