दैनंदिन खर्च दररोज सादर करा;निवडणुकीनंतर प्रमाणित विवरणपत्र आवश्यक-तहसिलदार विनोद गुंड्डमवार
आष्टी-ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून ते निवडणूक संपेपर्यत निवडणुकीचा दैनंदिन खर्च रोज सादर करणे बंधनकारक आहे.मागील निवडणुकीत ज्यांनी टाळाटाळ केली त्यांचे अर्ज या निवडणुकीत बाद ठरले.आंबाजोगाई,केज तालुक्यात उमेदवारांना त्याचा फटका बसला.ही बाब निवडणुकीच्या मैदानातील उमेदवारांनी लक्षात घ्यावी,असे अवाहन तहसीलदार विनोद गुंड्डमवार यांनी केले.
पुढे बोलतांना ते म्हणाले, की निवडणुक आयोगाने दिलेल्या सुचनेनुसार निवडणुक खर्चासाठी उमेदवाराने स्वतंत्र बँक खाते उघडणे गरजेचे आहे.अर्ज दाखल केल्यापासून ते निकाल घोषीत होईपर्यत दैनंदिन खर्च रोज सादर करणे आणि निवडणुक संपल्यानंतर बँकेचे प्रमाणीत विवरणपत्र सादर करणे आवश्यक आहे. जे उमेदवार टाळाटाळ करतात,त्यांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे धाडली जाते.या उमेदवारांना निवडणूक लढविण्यासाठी पाच वर्षे अपात्र केले जाते.मागील ग्रामपंचायत निवडणुकीत आंबाजोगाई,केज उमेदवारांनी निवडणूक खर्च सादर केले नाही.त्यामुळे २०१८ मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी या सर्वांना पुढील पाच वर्षे निवडणुक लढविण्यास अपात्र ठरविले होते.त्यामुळे या सर्वांना ही निवडणुक वाढविता आली नाही.प्रत्येक उमेदवाराला अर्ज दाखल करते वेळी त्याबाबतचे लेखी पत्र देखील देण्यात आले आहे. निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार दैनंदिन खर्च सादर करा अन्यथा पुढील पाच वर्षे निवडणूक लढविण्यास अपात्र ठरू शकता.ही बाब सर्व उमेदवारांनी लक्षात घ्यावी असे ही तहसिलदार गुंड्डमवार यांनी सांगीतले.
अन्यथा पाच वर्षे अपात्र
प्रत्येक उमेदवाराला अर्ज दाखल करताना खर्चाबाबतचे लेखी पत्र देण्यात आलेले आहे.निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार दैनंदिन खर्च सादर करावा,अन्यथा पुढील पाच वर्षे निवडणूक लढविण्यास संबंधित उमेदवार अपात्र ठरू शकतो.ही बाब सर्व उमेदवारांनी लक्षात घ्यावी,असे आवाहनही तहसीलदार तहसिलदार यांनी केले आहे.