गेवराई click2news-मंगळवारी सायंकाळी मेघगर्जनासह झालेल्या पावसामुळे गेवराई तालुक्यातील अर्ध मसला येथील तरूण आपल्या दुचाकीवरून जात असतांना पेंडगाव गावाजवळ दोघांचा विज अंगावर पडून मृत्यू झाला.मृतक बाबुराव सुर्यभान पिंपळे वय(२७),लहु उद्धव खरात वय(३२)यांचा विज पडुन मृत्यू झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवार दि.२४ रोजी बीड शहरासह जिल्ह्यात पावसाने वादळवा-यांसह हजेरी लावली होती.या पावसात गेवराई तालुक्यातील अर्ध मसला येथील तरूण आपले काम आटोपून बीडवरून आपल्या गावाकडे निघाले असता रात्री ८ च्या सुमारास पावसाने वादळवा-यासह अधिक जोर धरलाने यामध्ये पेंडगाव जवळपास त्यांच्या अंगावर वीज पडून दोघे जागीच ठार झाल्याची घटना घडली.दोन्ही मयतांवर बीड येथील जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येणार असून अंत्यविधी मुळ गावी होणार आहे.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.