आष्टी तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतच्या झाल्या आ.धस माजी आ.धोंडे गटाच्या ११९ ग्रामपंचायत अजून आ.आजबे गटाचा अकडा येणे बाकी
आष्टी-नुकत्याच झालेल्या तालूक्यातील १०९ ग्रामपंचायत निवडणूकीचा निकाल जाहिर झाला पण आ.धस गटाने ८० तर माजी आ.धोंडे गटाने ३९ ग्रामपंचायतवर दावा केला तर अजून आमदार आजबे गटाकडून अधिकृत आकडेवारी आली नाही.तर तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतच्याच धस-धोंडे गटाने११९ ग्रामपंचायतवर दावा केल्याने आता हि मॅजिक फिगर जुळणे माञ कठिण झाले आहे.
आष्टी तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतची रणधुमाळी काल संपली यामध्ये तालुक्यातील जामगांव,हाकेवाडी या दोन ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या तर १०७ ग्रामपंचायतचे निकाल दि.२० रोजी जाहिर झाले.या झालेल्या निवडणूकीत भाजपा आमदार सुरेश धस यांच्या गटाने ८० ग्रामपंचायतवर वर्चस्व असल्याचे जाहिर केले.तर भाजपाचे माजी आ.भीमराव धोंडे गटाने ३९ ग्रामपंचायतवर युवानेते अजय धोंडे यांच्या नेतृत्वाखाली ताब्यात असल्याचे प्रसिध्दी पञाद्वारे जाहिर केले.या दोन भाजपाच्या आजी-माजी आमदारांच्या गटानेच १०९ ग्रामपंचायत पैकी ११९ ग्रामपंचायतवर आपले वर्चस्व असल्याचे जाहिर केले.तर राष्ट्रवादी काॅग्रेसचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी माञ अजून त्यांच्या गटाकडे किती ग्रामपंचायत आल्या आहेत हे जाहिर केले नाही.तर आजबे गटाने आपल्या ताब्यात आलेल्या ग्रामपंचायत जाहिर केल्या तर अजून तालुक्यात किती ग्रामपंचायत वाढतील हे पाहण्यासाठी उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
एक सरपंच तिघांच्या दारात
ग्रामपंचायतवर विजय मिळविल्यावर नवनिर्वाचित सरपंच हि सत्कार घेण्यासाठी आ.सुरेश धस,आ.बाळासाहेबू आजबे व माजी आ.भीमराव धोंडे यांच्या दारात सत्कारासाठी स्वत;च जाऊन मी तुमचाच असल्याचे सांगत आहे.त्यामुळे एक सरपंच तिघांच्या दारात दिसत आहे.