व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

संभाजीराजेंनी काढला नविन पक्ष

0

मुंबई click2ashti राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असून सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. त्यातच आता छत्रपती संभाजीराजेे यांनी महाराष्ट्र स्वराज्य पक्ष या नावाने नवीन पक्ष स्थापन केला असून याला निवडणूक आयोगाने मान्यताही दिली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीराजे, आमदार बच्चू कडू, राजू शेट्टी यांनी तिसऱ्या आघाडीची घोषणा केली. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजेंच्या नव्या पक्षाला महत्व प्राप्त झाले आहे. स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून संभाजीराजेंंनी राज्यभर कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केले आहे. दरम्यान त्यांनी महाराष्ट्र स्वराज्य पक्ष या नावाने निवडणूक आयोगाकडे नोंदणी केली असून आयोगाकडून पक्षाचे चिन्हही देण्यात आले आहे. ितसऱ्या आघाडीच्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी ते करत आहेत. त्यात आता संभाजीराजे यांच्या पक्षाला स्वतंत्र पक्ष म्हणून निवडणूक आयोगाने मान्यता देखील दिली आहे.आगामी विधानसभा निवडणुकीत चांगलीच रंगत वाढणार असल्याचे दिसून येत आहे. नवीन पक्षाबाबत छत्रपती संभाजीराजे यांनी एका पोस्टच्य माध्यमातून माहिती दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.