व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

महाराष्ट्र केसरी सईद चाऊस यांंच्यावरील खोटा गुन्हा अखेर मागे

खोट्या आरोपांमुळे माझी झालेली बदनामी वेदनादायी

0

आष्टी(प्रतिनिधी)-तालमीतील पहेलवानाला कुस्तीत का हरवले अशी कुरापत काढून एका पहेलवानाला वाटेत अडवून मारहाण करुन चाकूहल्ला केला असल्याची घटना २३ नोव्हेंबर रोजी आष्टी शहरातील भगवान महाविद्यालयामागे घडल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.याप्रकरणी महाराष्ट्र केसरी सईद चाऊस यांंच्यासह २० जण अडणीत आले होते.याप्रकरणात मात्र गावक-र्यांनी एकत्र येवून हे प्रकरण मिटवण्याचे ठरवले.हा प्रकार कोणाच्या सांगण्यावरुन झाला
का ? का असे झाले ? असे प्रश्न निर्माण न करता राजकरणातून गावाची बदनामी किंवा मतभेद निर्माण होऊ नयेत तसेच एका चांगल्या खेळाडूचे आयुष्य यातून खराब होऊ नये यासाठी गावक-र्यांनी एकदिलाने हे प्रकरण तडीस नेत मार्गी लावले.गावातील सर्वांनी एकदिलाने हे प्रकरण मिटण्यात त्यांना यश आले असून,अखेर सईद चाऊस यांच्यावर झालेला खोटा गुन्हा मागे घेण्यात आला आहे.
गावातील नागरीकांची भुमीका अशी होती की,गावत कोणत्याही कारणारुन वाद होवू नये आणि कोणालाही विनाकारण यात गोवले जावू नये म्हणून त्यांनी हा वाद संपुष्टात यावा तसेच यातून
कोणाचेही नुकसान होऊ नये.युवकांना चांगले मार्गदर्शन करणारा व्यक्ती विनाकरत कोणत्याही प्रकरणात अडकू
नये म्हणून त्यांनी सईद चाऊस यांच्या चांगल्या कामाची पावती म्हणून सदरील मिटविण्यासाठी प्रकरणी पुढाकार घेतला आणि सदरील प्रकरण गावातील नागरीकांना मिटवण्यात यश आले.याबद्दल सईद चाऊस यांनी गावकऱ्यांचे आभार मानले आहे.महाराष्ट्र केसरी सईद चाऊस हे खेळाडूंना मार्गदर्शन करुन एक नवी दिशा देण्याचे काम करतात.त्यांनी देशभरामध्ये महाराष्ट्राच नांव उचावलेवे आहे.महाराष्ट्र सईद चाऊस हे राज्यातील विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देतात तसेच गरजवंतांकडून ते कोणत्याही प्रकारचे मानधन अथवा फी घेत नाही. त्यांच्याकडून विद्यार्थी घडत आहे.गोरगरीब विद्यार्थ्यांना मोठा आधार वाटतो.विद्यार्थ्यांना ते कायमच मदतीचा हात देतात.त्यांनी कोरोना काळातही अनेकांची मदत करुन मोठे योगदान दिले आहे.याची दखल घेऊन येथील नागरीकांनी पुढाकार घेऊन हे प्रकरण तडीस नेले.

माझी चुक असती तर अष्टीकरांनी बंद पाळला असता का ?-सईद चाऊस
माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता.मी एक खेळाडू आहे. मी फक्त कुस्तीमध्ये लढणारा पैलवान आहे.माझ्यावर गुन्हा दाखल झाल्याने अनेक जणांनी नाराजी व्यक्त केली कारण त्यांना देखील माझ्या स्वभावाची जाणीव आहे.मी अनेक ठिकाणी कुस्ती करून गावाची व महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावलेली आहे.भांडणे करणे व वाद घालणे हे माझे काम नाही.जर मी भांडणे केले असते तर आष्टीकरांनी माझ्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याच्या निषेधात आष्टी “बंद” पुकारला नसता.या प्रकरणामुळे माझ्या नावाची बदनामी झाली आहे.या गोष्टीची मरेपर्यंत खंत राहील.आज गावकऱ्यांनी सत्याच्या बाजूने भूमिका मांडली आहे मी सर्व गावकऱ्यांचे व माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांचे आभार मानतो.
-सईद चाऊस,महाराष्ट्र केसरी

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.