व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

वडिलांचे वय झाल्यावर ते स्वत: मुलावर जबाबदारी सोपवतात; पुतण्याचा काकांना टोला

0

पुणे click2ashti वडिलांचे वय झाल्यावर ते स्वत: आपल्या मुलावर आपल्या हाताने जबाबदारी सोपवतात. मात्र काही जण खुप हट्टी असतात असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांना लगावला. येत्या आठ, दहा दिवसात आचासंहिता लागेल आणि ३५ दिवसांनी मतदाना होईल असेही अिजत पवार यांनी सांगितले.
मावळ मतदारसंघातील विविध विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बाेलत होते. आगामी विधानसभा निवडणुकीमुळे राज्यातील राजकारण हळूहळू तापत चालले असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. मावळ येथील कार्यक्रमात पवार म्हणाले की, चार दिवस सासूचे तसे चार दिवस सुनेची ही असतात की नाही? का त्या सुनेने म्हातारी होईपर्यंत फक्त बघतच राहायचे? काही जण मात्र खुप हट्टी असतात कुणाचचं ऐकत नाहीत. आगामी विधानसभा निवडणुकीत सर्वांनी हेवेदावे विसरुन आपल्या उमदेवारांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करावेत असेही पवार म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.