व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

फोटोग्राफी व्यावसायात काळानुसार बदल करणे काळाची गरज-सुरेश धस

0

आष्टी click2ashti-सध्या सोशल मिडिया आणि महागड्या फोन मुळे फोटोग्राफी व्यावसाय संकटात आला पण या संकटातून मात करण्यासाठी फोटोग्राफर यांनी काळानुसार बदलले तर व्यावसायात मोठे यश मिळेल असा विश्वास माजीमंत्री सुरेश धस यांनी व्यक्त केला.

जाहिरात

आष्टी शहरातील मुर्शदपुर भागातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे गेल्या २१ वर्षापासून फोटोग्राफी करत असलेले अशोक राऊत यांनी ६ महिन्याच्या बाळापासून ते वयोवृध्दापर्यंत आधुनिक तंत्रज्ञान व महागड्या कॅमेरे उपलब्ध करत नविन फोटोग्राफी स्टुडिओ चे गुरुवार दि.३ रोजी सायंकाळी सात वा.माजीमंत्री सुरेश धस यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.या प्रसंगी मुर्शदपुर ग्रामपंचायत चे सरपंच अशोक मुळे,माजी जि.प.सदस्य खंडू जाधव, नाभिक संघटनेचे अध्यक्ष प्रविण कदम, प्राचार्य नागसेन कांबळ, आत्माराम फुंदे,रमेश बोराडे यांच्यासह आदि मान्यवर उपस्थित होते.पुढे बोलतांना धस म्हणाले,ज्या क्षेत्रात आपण काम करतो पण त्या क्षेत्रात काळारूपा नुसार बदल नाही केला तर व्यावसाय अडचणीत येतो.त्यामुळे व्यावसायिकांनी आधुनिक तंत्रज्ञान वापरून बदल करणे गरजेचे आहे.आणि पुढील पाऊले ओळखुनच अशोक राऊत यांनी हे आधुनिक फोटोग्राफी सुरु केली.त्यामुळे या व्यावसायाला नक्कीच भरभराटी मिळेल असेही त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बाळासाहेब तळेकर यांनी केले तर आभार संतोष राऊत यांनी मानले.

499/-च्या खरेदीवर जिंका पैठणी आजच भेट द्या…

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.