भारतीय उद्योगाचा महामेरू हरपला;भारतचा रत्न रतन टाटा यांचे निधन
मुंबई click2ashti-भारतीय उद्योगाचा महामेरू टाटा सन्सचे अध्यक्ष रतन नवल टाटा यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले.बुधवारी रात्री उशिरा त्यांच्या निधनाची माहिती प्रसिद्ध झाली.त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (आयसीयू) दाखल करण्यात आले होते.ते वयाशी संबंधित आजाराने त्रस्त होते.त्यांच्या निधनाने भारतीय उद्योगाचा महामेरू हरपला आहे.
दोन दिवसांपूर्वी त्यांना आयसीयूमध्ये दाखल केल्याची बातमीही आली होती.मात्र,त्यानंतर ते म्हणाले होते की मी ठीक आहे, काळजी करण्यासारखे काहीही नाही.2008 मध्ये रतन टाटा यांना पद्मविभूषण हा भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला. याआधी 2000 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.रतन टाटा यांच्या निधनाबद्दल टाटा सन्सचे चेअरमन एन चंद्रशेखर म्हणाले-आम्ही रतन टाटा यांना मोठ्या हानीच्या भावनेने निरोप देत आहोत.टाटा हे समूहाचे अध्यक्ष होते.