व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

दहा वर्षात आजी-माजी यांनी फक्त आयत्या पिठावर रेघोट्या ओढल्या-माजीमंत्री सुरेश धस

आष्टी येथे सभेत झाले भाजपची उमेदवारी जाहीर

0

आष्टी click2ashti-मतदार संघाच्या विकासात सत्ता असो किंवा नसो आपण कायम काम करत मी व माझे कुटूंब करित आहे.परंतु गेल्या दहा वर्षांत दोन लोकप्रतिनिधींना साधी सिंफदना तलावाची उंची वाढविता आली नाही.खुंटेफळ साठवण तलावाच्या बाबतीत फक्त आयत्या पिठावर रेघोट्या ओढण्याचे ह्या आजी-माजी यांनी केले असल्याचा आरोप माजीमंत्री सुरेश धस यांनी आमदार बाळासाहेब आजबे व माजी आमदार भीमराव धोंडे यांच्यावर नाव न घेता केला आहे.

आष्टी-येथील जाहिर सभेत बोलतांना सुरेश धस दिसत आहेत.

आष्टी विधानसभा मतदारसंघाचा उमेदवारी अर्ज सोमवार (दि.२८)रोजी सुरेश धस यांनी दाखल केल्यानंतर बाजारात येथे जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी मंगेश चिवटे, कडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमजान तांबोळी, माजी जि.प.सदस्य महेंद्र गर्जे,स्लिम जहाॅंगिर,आष्टी नगर पंचायतचे नगराध्यक्ष जिया बेग,अभिजीत शेंडगे,सुखदेव सानप, रंगनाथ धोंडे,विष्णुपंत चव्हाण यांच्यासह आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.पुढे बोलतांना सुरेश धस म्हणाले,माझ्या आयुष्यातली पहिली निवडणूक आहे.

आष्टी-उमेदवारी अर्ज दाखल करतांना सुरेश धस यांची विराट रॅली दिसत आहे.

कुणाच्या विरोधात फॉर्म माघारी घेई पर्यंत बोलता येणार नाही.पण मी आता माझ्या वडिलांसारखे काम करत आहे.मी राजकारणाला १९९२ पासुन गावच्या सरपंच पदापासून सुरु केली.ते मी आज तगायत फक्त लोकांचेच कामे मी आणि माझे कुटूंब करित आहे.आणि आष्टी मतदारसंघाची जागा स्व.गोपीनाथ मुंडे यांनी येथील जागा शिवसेनेकडून भाजपासाठी म्हणजे माझ्यासाठी घेतली.आणि आता परत यावेळेस पंकजा मुंडे यांनीही स्व. मुंडे साहेबांन सारखीच जबाबदारी पार पाडली असेही धस यांनी सांगितले.तलावातील गाळ काढा असे मी २००३ ला म्हणत होते आणि तिचं योजना कॉग्रेस पृथ्वीराज चव्हाण सरकारने २०१२ साली कार्यान्वीत केली.म्हणजे आपण दहा ते बारा वर्ष आगोदच व्हिजन केले होते.मी गेल्या दहा वर्षांपुर्वी जे काम केले तेवढेच आहेत.उदाहरण देईचे झाले तर सिंदफना तलाव,गहूखेल तलाव,खुंटेफळ तलावाचे काम आहेत त्या परिस्थितीत आहेत.येणा-या दिड वर्षात मी खुंटेफळ साठवण तलावाचे व पाइपलाइन चे काम पुर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.सध्याचे लोकप्रतिनिधी निवडणूका आल्या की,मतदार संघाचा दौरा सुरू करतात अन् निवडणुका संपल्या की एसीत बसतात अन् परत म्हणतात आम्ही गोरगरिबांच्या कामात येतोत असं कुठं जमत असतं का?कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माऊली जरांगे यांनी करून आभार मानले.
दुपारी साडेतीन वाजता झाली उमेदवारी जाहीर
येथील उमेदवारी ही राष्ट्रवादी काँग्रेस ची असल्याने या जागेचा सस्पेन कायम होतादरम्यान उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या सभेतच दुपारी ३.२७ मिनिटांचे उमेदवारी जाहीर झाल्याचे वृत्तवाहिनीवर कळाले अन् सभेत सांगताच एकच जल्लोष कार्यकर्त्यांनी साजरा केला.आणि भाजपाच्या तिस-या यादीत भारतीय जनता पक्षाने सुरेश धस यांची उमेदवारी जाहीर केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.