मतदान जनतेचं,प्रगती जनतेची हा नारा हाती घेऊन मतदारसंघात बदल घडवायचा-नारायण अंकुरे
एकच निर्धार,सैनिकाला मतदान
आष्टी click2ashti-आज पर्यंत आपल्या मतदानावर हे राजकारणी आपला स्वार्थ साधत आहेत.आता शेतक-यांची जाण व मान राखणाखरा म्हणजे सैनिक होय,त्यामुळे येणा-या विधानसभेत मतदान जनतेचं,प्रगती जनतेची हा नारा हाती घेऊन मतदारसंघात बदल घडवायचा असल्याचे प्रतिपादन भारतीय जवान किसान पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण अंकुरे यांनी केले.
आष्टी मतदारसंघातील भारतीय जवान किसान पक्षाचे उमेदवार अंकुश खोटे यांच्या प्रचारार्थ आष्टी तालुक्यातील श्रेगृंरी देवस्थान येथे शनिवार दि.2 रोजी दुपारी 3 वा.आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी जगन्नाथ खामकर,महादेव खेडकर,महादेव बांगर,गोवर्धन गर्जे,संजय म्हस्के,बळीराम डोंगरे,
रामराव तांबे,अमृत ढोबळे,संजय गायकवाड,ज्ञानदेव काकडे, दादासाहेब ठोंबरे,अजिनाथ खिळे यांच्यासह आदि मान्यवर उपस्थित होते.पुढे बोलतांना अंकुरे म्हणाले,जवानांनी कर्तव्यावर जीव धोक्यात टाकून देशात घाण येऊ दिले नाही.पण त्याच जवानाला नोकरी संपल्यावर जो सन्मान व वागणुक मिळते ते न बघण्यासारखी व बोलण्यासखरखी झाली आहे.सध्या महाराष्ट्रातील राजकारणातील दशा आणि दिशा आणि बदलण्याचे काम आपल्या जवानांना करायचे आहे.