आजपासून पंकुताई ने राजकारणातील सहकारी गमवला-सुरेश धस
सुरेश धस यांनी विजयी सभेत डागली विरोधकांवर तोफ
आष्टी click2ashti-गेल्या पसत्तीस वर्षापासून मी राजकारणात असून वीस वर्ष आमदारकी भोगली मी लोकसभा निवडणुकीत माझा समाजाचा रोष पत्कारून प्रामाणिकपणे काम केले.आणि आत्ता विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही माझा प्रचार कसा केला हे मी नाही तर संपूर्ण मतदारसंघाने पाहिले.मतदारसंघाने इमानदारी जपली पण तुम्ही नाही.आजपासून तुम्ही राजकारणातला सहकारी गमवला असल्याचे इशारा सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांना विजय सभेत दिला आहे.
आष्टी विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत आज ७७ हजार ९७५ मतांनी सुरेश धस यांनी विजय मिळवल्यानंतर आष्टी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शनिवार दि.२३ रोजी सायंकाळी ५ वा.आयोजित करण्यात आलेल्या विजय सभेत ते बोलत होते.यावेळी पुढे बोलतांना आ.सुरेश धस म्हणाले,आज मला मतदार संघांतील जनतेने पाचव्यांदा आमदार म्हणून प्रचंड मताने विजय करून काम करण्याची संधी दिली.त्याबद्दल मी मतदार संघाचा कायम ऋणी राहिल.मी माझ्या राजकीय जिवनात कधीच जातीवाद केला नाही.आणि तुम्ही स्व.गोपीनाथ मुंडे यांची कन्या असूनही त्यांच्या राजकारणात कधीच त्यांनी असे लेच्या-पेच्याचे राजकारण केले नाही.पण तुम्ही कुणाच्या तरी सांगण्यावरून आम्हाला निवडणुकीत पाडण्यासाठी रणनिती करता हे वागणं चांगलं नाही पंकजाताई असेही सुरेश धस म्हणाले.यावेळी माजी आमदार भिमराव धोंडे यांच्यावर तोफ डागत धोंडे साहेब आपण संस्थानिक आहात पण तुमचे काय धंदे सुरु आहेत हे सगळ्यांना माहित आहे.तसेच आता त्यांच्या संस्थेतील शिक्षकांना आता त्रास होणार नाही.तर राष्ट्रवादी चे उमेदवार बाळासाहेब आजबे यांच्यावर टिका करतांना ते म्हणाले,हा रणिगं आमदार सभेत मला म्हणतो खोडावर घाव घालतो आरे चांगली कु-हाड घेऊन शेतातील झाडाच्या खोडावर घाव घालत बस कारण तुमची क्षमता मतदारसंघाने आजच्या निकालात पाहिली असल्याचे त्यांनी सांगितले.