व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

जितेंद्र आव्हाडांना फक्त रॉकेल टाकून पेटवायचाच धंदा जमतो का? आ. सुरेश धस

0

जितेंद्र आव्हाडांना फक्त रॉकेल टाकून पेटवायचाच धंदा जमतो का? आ. सुरेश धस
मुंबई । प्रतिनिधी
मोर्चेकरांच्या संमतीनं मोर्चा मिटवणं योग्य की अयोग्य? जितेंद्र आव्हाड यांना फक्त रॉकेल टाकवून पेटवायचाच धंदा जमतो का? महाराष्ट्राचं सामाजिक स्वास्थ नीट राहिलं न पाहिजे का? असेही धस म्हणाले. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात मुंबईला येणारा लाँग मार्च नाशिकमध्ये थांबवल्यानं जितेंद्र आव्हाडांना पोटशूळ उठलाय का? असा सवाल देखील आमदार सुरेश धस यांनी केला.

आ.धस म्हणाले की, संतोष देशमुख आिण सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी मी पहिल्यापासून आवाज उठविला आहे. सर्व मोर्चात मी दोन्ही बाजूने सारखाच बोललो आहे. प्रकरण तिथल्या तिथे मिटलं त्यामुळं त्यांना पोटशूळ उठल्याचे धस म्हणाले. जितेंद्र आव्हाड मोर्चात होते पण ते सोमनाथवर बोललेही नाहीत. धाराशिवला आले नाहीत फक्त बीडला आले. मी पहिल्या दिवसांपासून मोर्चेकऱ्यांच्या संपर्कात होतो. आम्ही दररोज विनंती करत होतो क्लेशकारक आंदोलन थांबवा. यात न्यायालयीन चौकशी लावलेली आहे. आव्हाड यांना आवाहन आहे की, दोन्ही प्रकरणात जराही काही वाटत असेल तर ठाण्यात किंवा मुंबईत लाखोचा मोर्चा काढा असेही धस म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.