व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

जय शिवाजी –जय भारत पदयात्रेचे आयोजन

0

बीड । प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज यांची 395 वी जयंती दि. 19 फेब्रुवारी 2025 रोजी साजरी होत आहे. या निमित्ताने केंद्र शासनाने महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्हयामध्ये जय शिवाजी- जय भारत पदयात्रा राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

ही जय शिवाजी-जय भारत पदयात्रा 4 ते 5 कि.मी. इतक्या अंतराची आयोजित करुन यामध्ये औद्योगिक प्रतिष्ठाणे, महाविद्यालये, नवउद्योजक, शैक्षणिक संस्था, सांस्कृतीक वारसा जतण करणा-या बाबी तसेच शहरातील व राज्यातील महत्वपूर्ण बाबी यांचे प्रदर्शन होईल असा सर्वकष विचार करुन संदर्भ क्र. 3 नुसार बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार दि. 19 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळच्या सत्रात पदयात्रेचे आयोजन करण्यात यावे. या अनुषंगाने सर्व जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी या पदयात्रेचे आयोजन जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हयातील मान्यवर,सर्व शैक्षणिक संस्था, विद्यापीठे,एन जी ओ,एन एस एस,एन वाय के, संस्था व My Bharaat Volunteers यांच्याशी समन्वय साधून केंद्र शासनाच्या सूचनेनुसार पदयात्रेचे आयोजन करण्यात यावे.संबधित अधिका-यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन जय शिवाजी –जय भारत पदयात्रा कार्यक्रमाचे आयोजन करावे असे महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक सेवा सहसंचालक यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.