व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

उस्मानाबाद-बीड-औरंगाबाद रेल्वे लाईनसाठी तपासणीचे आदेश

१० फेब्रुवारीला खा.बजरंग सोनवणेंनी केली होती नव्या रेल्वे मार्गासाठी केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी

0

बीड । प्रतिनिधी

उस्मानाबाद (धाराशिव)-बीड-औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) रेल्वे लाईन प्रकल्पाला मंजुरी देण्याची आणि ती जलद करण्याची मागणी दि.१० फेबुवारी रोजी खा.बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत शिवजयंतीच्या मुहूर्तावर केंद्रीय मंत्र्यांनी संबधित रेल्वेमार्गाची तपासणी करण्याचे आदेश रेल्वे संचालकांना दिले आहेत.

खा.बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांना दिलेल्या पत्रात म्हटले होते. उस्मानाबाद-बीड-औरंगाबाद नवीन मार्ग प्रकल्पाचा २८ जुलै २०२२ रोजी रेल्वे बोर्डाला अहवाल सादर करण्यात आला. या प्रकल्पाची एकूण लांबी २४०.१५ किमी आहे. ज्याचा अंदाजे खर्च ४८५७.४७ कोटी रुपये आहे. मराठवाडा प्रदेशात अखंड कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यासाठी, प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी आणि व्यापार आणि उद्योगासाठी नवीन मार्ग उघडण्यासाठी हा रेल्वे मार्ग महत्त्वाचा आहे. याव्यतिरिक्त, प्रस्तावित प्रकल्पाचा-२.४७ टक्केच्या परतावा दराने (आरओआर) आढावा घेण्यात आला आहे. ज्यामुळे रेल्वे नेटवर्कसाठी व्यवहार्य आणि फायदेशीर गुंतवणूक सुनिश्चित होईल. या प्रकल्पात राज्य सरकारसोबत खर्च वाटप मॉडेलचाही समावेश आहे. या प्रकल्पाचे धोरणात्मक महत्त्व लक्षात घेता, या रेल्वे मार्गाचे बांधकाम लवकरात लवकर सुरू करण्यासाठी आवश्यक निधीची मंजुरी आणि काम सुरु करण्यास प्राधान्य देणे. प्रकल्प अंमलबजावणीत आणखी विलंब होऊ नये म्हणून मंजुरी प्रक्रिया जलद करणे. सुरळीत अंमलबजावणीसाठी केंद्र आणि राज्य संस्थांमध्ये समन्वय साधणे यासाठी बीड जिल्ह्याचे खासदार प्रयत्नशील आहेत. हा रेल्वे मार्ग एक महत्त्वाचा दुवा म्हणून काम करेल. ज्यामुळे या प्रदेशात आर्थिक समृद्धी येईल आणि येथील रहिवाशांचे जीवनमान सुधारेल, असे म्हटले होते. यानंतर ९ दिवसाने म्हणजेच शिवजयंतीच्या मुहूर्तावर दि.१९ फेब्रुवारी रोजी केंद्रीय रेल्वेमंत्री यांनी पत्राव्दारे या प्रकल्पास मंजुरी देण्याबाबत प्रकल्पाची व्यवहार्यता व सुविधा तपासणी करण्याचे आदेश संबंधित संचालक यांना देण्यात आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.