व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

आमदार सुरेश धस यांच्या मागणीला यश;अखेर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात उज्वल निकम यांची नियुक्ती

0

आष्टी-संतोष देशमुख हत्या प्रकरणात दि.१८/१२/२०२४ रोजी आमदार सुरेश धस यांनी जा.क्र.२७/२०२४ या पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती अशी मागणी केली होती.यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत अखेर उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकिल म्हणून नियुक्ती केली आहे.निवड होताच आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री यांचे विशेष आभार मानत स्व.संतोष देशमुख ला न्याय मिळणार असल्याचे सांगितले.

सगळ्या राज्याला हादरवून सोडणाऱ्या आणि मागच्या काही महिन्यांपासून गाजत असलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात अखेर उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकिल म्हणून नियुक्ती झाली आहे.बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकिल म्हणून नियुक्ती झाली आहे.विशेष सरकारी वकील म्हणून उज्जवल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती.तर आमदार सुरेश धस यांनी दि.१८/१२/२०२४ रोजी आमदार सुरेश धस यांनी जा.क्र.२७/२०२४ या पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती अशी मागणी केली होती.

आमदार सुरेश धस यांनी मागणी केलेले पत्र

तसेच गेल्या दोन दिवसांपासून मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आपल्या सात मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन सुरु केलं आहे.आज या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. मस्साजोगच्या ग्रामस्थांच्या सात मागण्यांपैकी उज्वल निकम यांच्या नियुक्तीची एक मागणी मान्य करण्यात आली आहे.उज्वल निकम यांच्या नियुक्तीच,हे प्रकरण सुरुवातीपासून लावून धरणारे आमदार सुरेश धस,धनंजय देशमुख यांनी स्वागत केलं आहे.उज्वल निकम यांनी 1993 सालच्या साखळी बॉम्बस्फोट मालिकेपासून ते मुंबईवर 2008 साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यापर्यंतचे खटले यशस्वीरित्या लढवले आहेत.मस्साजोगमध्ये सुरु असलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे.आरोग्य पथकाकडून धनंजय देशमुख व संतोष देशमुख यांच्या आई शारदबाई देशमुख यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.धनंजय देशमुख यांनी कालपासून पाणीही घेतलेलं नाही.धनंजय देशमुख यांचा रक्तदाब सामान्य असल्याची डॉक्टरांनी माहिती दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केलेले पत्र

नवनीत कावत यांचा निरोप काय?
केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वैभव पाटील हे धनंजय देशमुख यांच्या सोबत चर्चा करण्यासाठी आले आहेत. मागण्या मान्य होत आहेत आंदोलन स्थगित करा हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांचा निरोप वैभव पाटलांनी धनंजय देशमुख यांना दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.