व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

माझ्या प्रश्नांची दखल जर पक्षानेही घेतली नाही तर मी वेगळा निर्णय घेऊ शकतो-माजी आ.बाळासाहेब आजबे

0
आष्टी click2ashti-मतदार संघातील माझ्यासह कार्यकर्ते यांची गळचेपी होत असून,आमदार सुरेश धस हे जाणुन-बुजून त्रास देतात.यावर मी माझ्या वरिष्ठ नेते अजित पवार यांच्याशी बोललो असून,यावर तोडगा निघत नसेल तर मी उद्या वेगळा निर्णय घेऊ शकतो असे प्रतिपादन माजी आ.बाळासाहेब आजबे यांनी सांगितले.
               आष्टी तालुक्यातील शिराळ येथील माजी आ.बाळासाहेब आजबे यांच्या फार्म हाऊसवर रविवार दि.2 रोजी दुपारी 12.30 वा.आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.पुढे बोलतांना माजी आ.बाळासाहेब आजबे म्हणाले,आष्टी,पाटोदा,शिरूर मतदारसंघातील आमदार सुरेश धस यांनी जाणूनबुजून विकास कामे आडवली आहेत.हे विकासकामे अडविणे म्हणजे मतदार संघाचे नुकसान होत,याबाबत आपण पालकमंत्री अजित पवार यांना भेटून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही येथील माहिती देणार आहोत.महायुतीत असूनही एवढी गळचेपी होत असेल आणि यावर तोडगा निघत नसेल तर मी उद्या वेगळा निर्णय घेऊ शकतो वेळ पडली तर एमआयएम पक्षात सुध्दा प्रवेश घेईल.इतका त्रास आपल्याला होत असल्याचे माजी आमदार बाळासाहेब आजबे यांनी सांगितले.यावेळीशेख हमीद शेख आतार म्हणाले,मी आणि माझ्या भाऊ यांनी जमिन होती त्यामध्ये न्यायालयात प्रकरण सुरू होते.निकालही माझ्या बाजूने लागला तरीही माझ्या जमिनीच्या चुकीच्या चुतुर सिमा टाकून माझी जमिन परस्पर विकून टाकली आहे.जर आपण काहि बोललो तर मला खोट्या गुन्ह्यात अडकावण्याच्या दम देतात.तसेच आष्टीतील गणेश धुमाळ यांच्या बाजूने तर औरंगाबाद खंडपीठाने निकाल देऊनही माझ्या जमिनीची नोंद तलाठी लावत नाही,पोलिस प्रशासन सहकार्य करत नाहीत,माझ्या जमिनीत मला जाता येत नसल्याचेही त्यांनी सांगितले
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.