तिरंगा रॅलीत माजी आमदार भिमराव धोंडे यांचा अजब सल्ला;लोकसंख्या वाढविण्यासाठी लाजू नका
आष्टीत भिमराव धोंडे यांच्या नेतृत्वाखाली तिरंगा संपन्न
आष्टी click2ashti-भारताने ऑपरेशन सिधुंर करत पाकिस्तानला वटणीवर आणले आणि पाकिस्तानला भारताची ताकद दाखवून दिली.पण आता भारतामध्ये अन्न धान्यांची कमी नाही,त्यामुळे नागरिकांनी लोकसंख्या वाढीसाठी लाजु नये असा अजब सल्ला माजी आमदार भिमराव धोंडे यांनी तिरंगा रॅलीत दिला आहे.
भारतीय सैन्यांनी केलेल्या कामगिरीमुळे त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी व अभिनंदन करण्यासाठी आष्टी येथे गुरूवार (दि.५)रोजी दुपारी १२ वा.माजी आमदार भिमराव धोंडे यांच्या नेतृत्वाखाली तिरंगा रॅली काढण्यात आली.

यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.यावेळी माजी शिक्षण सभापती नियामत बेग,रिपाईचे तालुकाध्यक्ष अशोक साळवे,रामनाथ खेडकर,अजय धोंडे, पांडुरंग गावडे,यांच्यासह माजी सैनिक व इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.पुढे बोलतांना धोंडे म्हणाले,भारताने पाकिस्तानमध्ये सिधुंर ऑपरेशन करत जगाला ताकद दाखवून दिली.भारताची पाकिस्तान विरोधात लढाईच नाहीच कारण पाकिस्तान आपला स्पर्धेक नाहीच.भारत जगात लोकसंख्येच्या बाबतीत जगात पहिला क्रमांकावर आहे.आता हा क्रमांक एक ठेवण्यासाठी नागरीकांनी लोकसंख्या वाढीसाठी लाजू नये असा अजब सल्ला माजी आमदार भिमराव धोंडे यांनी उपस्थितांना दिला.ही रॅली दुपारी १२ वा.किनारा चौक,छ.शिवाजी महाराज चौक,शनि चौक,कापड बाजार,कमानवेस, डॉ.आंबेडरकर चौक,महात्मा फुले चौक या मार्गी येत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मान्यवरांच्या भाषणाने व राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला.