अहमदनगर-बीड-परळी रेल्वे चे काम प्रगतीपथावर वर्षाअखेर रेल्वे धावणार
रेल्वे विभागाची माहिती
click2ashti update-अहमदनगर- बीड -परळी नवीन लाईन हा एकूण लांबी २६१.२५ किमी प्रकल्प असून,मागील वर्षी २३ संप्टेंबर २०२२ रोजी ६६.१८ कि.मी.पुर्ण अहमदनगर ते न्यू आष्टी फेरीही सुरू झाली आहे.या न्यू आष्टी ते इगनवाडी हा ६७.१२ कि.मी.रेल्वे मार्ग पुर्ण होत असून,या वर्षा अखेर अहमदनगर ते इगीनवाडी पर्यंत रेल्वे धावणार असून एकूण २६१.२५ कि.मी.पैकी १३३.३ कि.मी.काम आता पुर्ण होऊन लवकरच रेल्वे धावणार आहे.तसेच अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ नवीन लाईन-CR ने एप्रिल 2023 पासून आजपर्यंत 147.77 किमी मल्टीट्रॅकिंग (नवीन लाइन/दुहेरी/3री/4थी लाइन) पूर्ण केली.3886.95 करोड ने या वर्षात नवीन ओळी/दुहेरी/3री/चौथी लाईनसाठी नियोजित 2983.47 कोटी खर्च आजपर्यंत झाला असल्याने आता लवकरच अहमदनगर-परळी रेल्वे मार्ग पुर्ण होणार असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या अनेक वर्षापासून बीडकरांचे अधुरे राहिलेले स्वप्न आता पुर्णत्वाकडे जात असून अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचे प्रगती पथावर काम सुरू आहे.हा मार्ग एकूण २६१.२५ कि.मी.चा असून या पैकी २३ सप्टेंबर २०२२ रोजी अहमदनगर-न्यू आष्टी पर्यंत पुर्ण होऊन रेल्वेची नियमित फेरीही सुरू झाली.आता दुस-या टप्यात न्यू आष्टी ते इनगवाडी हे काम या वर्षाअखेर पुर्ण होत आहे.ह्या रेल्वे प्रकल्पाची एकूण किंमत- ४८०८.१७ कोटी असून आजपर्यंतचा खर्च- ३६४६.०९ कोटी खर्च केले आहेत,या कामाची एकूण भौतिक प्रगती- ७८%,
जमीन संपादन पूर्ण-१८२१ हेक्टर पैकी १८०६ हेक्टर म्हणजे (९९%).जमिन संपादीत झाली आहे.व आता इगनवाडी ते परळी हा १२७.९५ कि.मी.रेल्वे प्रकल्पाचे काम प्रगती पथावर आहे.
अर्थवर्क- 419.235/430.43 (97.40%)
प्रमुख पूल – 49/64 (77%)
मायनर ब्रिज – 250/301(83%)
ROB/RUB – 126/195 (65%)
बॅलास्ट पुरवठा – 6.54/7.52 Lcm (87%)
ट्रॅक लिंकिंग – 118.38/285.89 किमी (41%)
पॉवर लाईन क्रॉसिंग – 568/626 (91%)
अहमदनगर-बीड- परळी-वैजनाथ नवीन लाईन
लांबी – 261.25 किमी
लांबी कार्यान्वित – 66.18 किमी
उर्वरित – 195.25 किमी
एकूण शारीरिक प्रगती – 78%
जमीन संपादन – १८२१.५६/१८०६.१९ हेक्टर (९९%)
एकूण किंमत – रु. ४८०५.१७ कोटी
आजपर्यंतचा खर्च – RS 3699.Cr
अशी माहिती मध्य रेल्वे,मुंबई प्रसिध्दीपञक जनसंपर्क विभाग, यांनी जारी केलेल्या दिनांक ३ नोव्हेंबर २०२३ प्रसिध्दी करत ही लाईन पूर्ण झाल्यास अहमदनगर आणि बीड जिल्ह्यांचा संपर्क सुधारेल आणि या क्षेत्राचा सामाजिक-आर्थिक विकास होईल.