मल्टीस्टेटमुळे ठेवींदारांवर मरण्याची वेळ;सरकारने मल्टीस्टेटला निर्बध लावावेत
मोठ्या विड्राॅलाला लागतात दोन दिवस
click2ashti update-लोकांनी मोठ्या विश्वासाने ठेवलेले पैसे आपले खाजगी उद्योग प्लॉटिंग जमिनी घेण्यासाठी तसेच कारखाने आणि उद्योगधंदे उभारण्यासाठी वापरायचे आणि मनी लॉन्ड्रींग करत संस्था बुडाल्या की फरार व्हायचे असा सगळा उद्योग बीड जिल्ह्यातील वेगवेगळ्या मल्टीस्टेट आणि पतसंस्था चालकांनी केला यामुळे हजारो कोटी रुपये ठेविधानांचे बुडाले मात्र आता ज्या पतसंस्था आणि मल्टीस्टेट सुरू आहेत त्यांच्यासमोरही ठेवी काढण्यासाठी मोठी गर्दी दिसत असून ठेवीदारांना पैसाही वेळेवर मिळत नाही.त्यामुळे या मल्टीस्टेटमुळे ठेवीदारांनावर मरण्याची वेळ आली आहे.या मल्टीस्टेटच्या गलथान कारभार टाळण्यासाठी सरकारने कडक निर्बध आणण्याची गरज असल्याची गरज आहे.
बीड जिल्ह्यात गेल्या वर्षभरात दहा पेक्षा अधिक पतसंस्था आणि मल्टीस्टेटला कुलूप लागले ज्ञानराधा असो परिवर्तन असो साईराम असो की मातोश्री अनेक पतसंस्था शेकडो कोटी रुपये गोळा करून बंद झाल्या यामागचा शोध घेतला असता एक लक्षात आले की, ज्ञानराधा वाले कुटे असोत की जिजाऊ मासाहेब वाले शिंदे असो अथवा साईराम अर्बनचे परभणे या सगळ्यांनी ठेवीदारांच्या पैशाचा स्वतःच्या उद्योग व्यवसायासाठी सर्रास वापर केला.सगळे नियम कायदे धाब्यावर बसवत या लोकांनी कोट्यावधी रुपयांच्या जमिनी खरेदी केल्या एवढेच नाही तर परभणे सारख्यांनी गुळ कारखाने स्टील उद्योग सुरू केले बबन शिंदे यांनी मेडिकल कॉलेज साठी आणि प्लॉटिंग साठी हा पैसा वापरला त्यामुळे अचानक मार्केटमध्ये मंदी आली आणि लोकांनी आपल्या ठेवी काढण्यासाठी एकच गर्दी केली.त्यामुळे या पतसंस्था आणि मल्टीस्टेट ला कुलूप लागले आज घडीला बीड जिल्ह्यातील अडीच ते तीन हजार कोटी रुपये या पतसंस्थांमध्ये अडकून पडले आहेत.आणखी देखील अनेक पतसंस्थांनी अशाच पद्धतीने मनी लॉन्ड्री चे धंदे केल्यामुळे लोकांनी आता आपल्या ठेवी काढून घेण्यासाठी गर्दी केल्याचे चित्र आहे.गेल्या महिन्याभरात बीड,माजलगाव,गेवराई,अंबाजोगाई,परळी,आष्टी,पाटोदा या भागातील अनेक पतसंस्था आणि मल्टीस्टेट मधून जवळपास 400 ते 500 कोटी रुपये ठेवीदारांनी काढून घेतले आहेत.एवढा पैसा घरी किंवा राष्ट्रीयकृत बँकेत ठेवण्यापेक्षा लोकांनी हा पैसा प्लॉटिंग मध्ये गुंतवण्यास सुरूवात केली तर आपले पैसे सुरक्षित राहतील.
मल्टीस्टेटवर भरवसा ठेऊ नये
मल्टीस्टेटचा व्यवहार कितीही चांगला आणि कितीही शाखा असल्या तरी लोकांनी या मल्टीस्टेटवाल्यांवर भरवसा ठेऊ नये,कारण त्या एकाच दिवशी ५०-६० शाखा असल्या तरी कुलूप लावून पसार होतात.त्यामुळे नागरिकांनी आपल्या ठेवी सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात.
मोठ्या विड्राॅलाला लागतात दोन दिवस
हजारो कोटी रूपायांच्या असलेल्या ठेवी ठेऊन कर्ज बोटांवर मोजण्या इतकेच देऊन ते ही कर्ज फक्त सोने तारणाचेच देत सर्व शाखेचा पैसा मुख्य शाखेत जमा करून घेतात व मोठा विड्राॅल आला तर तो दोन दिवसांनी मिळतो अशी परिस्थिती आष्टी सारख्या शहरात दिसत आहे.ठेवींदारांना असे आढळून आल्यास वेळीच परिस्थिती ओळखून आपले पैसे काढून घ्यावेत.