व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

“मल्टीस्टेट”च्या घोटाळ्यांनी बीड जिल्हा जेरीस;आयुष्याची जमापुंजी अडकल्याने ठेवीदार अडचणीत?

मल्टीस्टेट मधील सर्वसामान्यांच्या पैशाला वाली कोण !

0

गणेश दळवी आष्टी-एखाद्या कर्जदाराचा कर्जाचा हप्ता थकला तर मल्टीस्टेटवाले खातेदाराला दहा वेळा संपर्क साधून कर्जाचा हाप्ता भरण्यासाठी तगादा लावते.वेळ प्रसंगी त्याच्यावर कारवाई म्हणून दंडही लावते.पण आयुष्यभराची जमापुंजी सुरक्षित म्हणून मल्टीस्टेटमध्ये ठेवलेल्या मल्टीस्टेटला जर टाळे लागले तर किंवा घोटाळा झाला तर ठेवीदाराच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही.तर वेळप्रसंगी अनेक ठेवीदार त्यांची रक्कम गेल्याच्या भीतीने जीवनयात्राही संपवतात, अशी विदारक स्थिती बीड जिल्ह्यात गेल्या वर्षभरात पाहायला मिळाली आहे.घोटाळे झालेल्या मल्टीस्टेटमधील ठेवीदार किंवा ग्राहकांना खरच शासनाकडून दिलासा मिळेल का, त्यांना न्याय मिळावा म्हणून सरकारकडून काही ठोस पावले उचलली जातील का, असा प्रश्न हिवाळी अधिवेशनानिमित्त उपस्थित केला जात आहे.
गेल्या वर्षभरात मल्टीस्टेट घोटाळ्यांनी बीडसह नगर जिल्ह्याला जेरीस आणले आहे.गेल्या महिनाभरात बीड जिल्ह्यातील किमान तीन ते चार मल्टीस्टेटला कुलूप लागले आहे.या तीन चार मल्टीस्टेटचे संस्थाचालक खुप स्ट्राॅग आहेत,पैसे बुडणार नाहीत,पैसे मिळतील पण थोडा वेळ लागेल या आशेने ठेवीदार आपल्याच ठेवलेल्या पैशाची भिका-या सारखी वाट पाहत आहे अशी स्थिती सध्या जिल्ह्यात पाहण्यास मिळत आहे.या सर्व ठेवीदारांचे आर्थिक नियोजन कोलमडले असून,ज्ञानराधा सारख्या मल्टीस्टेटच्या जामखेड शाखेत एका भाजी विक्रेत्यांने पै-पै करत पैसे जमा करून ठेवी ठेवली.ह्या ठेवी ठेवलेल्या पावतीची मुदत आॅगस्टमध्येच संपून गेली.त्यावरील रक्कम त्यांच्या सेव्हींग खात्यावर ठेवली आणि तो विड्राॅल करायला गेला की आज नका करू दोन तीन दिवसांनी विड्राॅल करा आत्ता पैशांची गरज नसेल तर राहूद्या असे सांगत वेळ मारून नेहत जवळपास आता चार महिने होत आले आहेत.त्यांना फक्त कोर्टा सारखे तारीख ते तारीख मिळत असून पैसे माञ अजूनही मिळाले नाहीत.आता त्यांना १५ डिसेंबरचा वायदा करण्यात आला असल्याचे ठेवीदाराने click2ashti शी बोलतांना नाव न छापण्याच्या अटीवर सांगीतले.
सर्वसामान्यांच्या पैशाला वाली कोण?
जिल्ह्यातील गेल्या काही दिवसांमध्ये पतसंस्था, अर्बनमधील बँकिंग घोटाळ्यांनी खळबळ उडालेली आहे. सर्वसामान्यांचा पैसा पतसंस्थांमध्ये असतो.व्याजदर जास्त मिळत असल्याने तुटपुंज्या कमाईतूनही थोडीशी बचत करीत गोरगरीब मल्टीस्टेटला प्राधान्य देतात.पण आता त्यांचा पैसाच सुरक्षित नसल्याचे स्पष्ट होत आहे.बीएचआर,शुभकल्याण,परिवर्तन, ज्ञानराधा,श्रीसाईराम अर्बन,जिजाऊ मासाहेब या पाटोपाट आठ दिवसापासून परळी येथील राजस्थानी मल्टीस्टेटच्याही सर्व शाखा बंद आहेत.त्यामुळे बोटावर मोजण्याइतक्या पतसंस्था चांगले काम करीत असूनही त्यांनाही याचा फटका सहन करावा लागत आहे.
(कशा येतात मल्टीस्टेट अडचणीत वाचा उद्याच्या भागात)

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.