व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

भडकाऊ भाषण करणा-या मौलानाला मुंबईतून अटक;हजारो समर्थक जमले,पोलिसांनी लाठीमार केला

गुजरात एटीएस ने जुनागडला नेले

0

click2ashti update-गुजरातमधील जुनागडमध्ये भडकाऊ भाषण करणाऱ्या मौलाना मुफ्ती सलमान अजहरीला गुजरात एटीएसने मुंबईतील घाटकोपर येथून रविवारी रात्री ताब्यात घेतले. यानंतर त्यांचे हजारो समर्थक पोलीस ठाण्याबाहेर जमले आणि त्यांच्या सुटकेची मागणी करू लागले.यानंतर समर्थकांची समजूत घालण्यासाठी मौलाना यांनी पोलीस ठाण्यात शांतता राखण्याचे आवाहन केले. रात्री 1 वाजेपर्यंतही परिस्थितीत सुधारणा न झाल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. यानंतर रात्री 2 वाजण्याच्या सुमारास गुजरात एटीएस मौलानासोबत जुनागडकडे रवाना झाली.
याबाबत अधिक असे,दि.31 जानेवारी रोजी मौलाना यांनी मुंबईतील बी डिव्हिजन पोलिस स्टेशनजवळील एका मैदानात आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले होते.यादरम्यान मौलाना म्हणाले होते,“काही वेळ शांतता आहे आणि मग आवाज होईल, आज कुत्र्यांची वेळ आहे, उद्या आमची पाळी येईल.”मौलाना यांच्या या वक्तव्यावर हिंदू संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.त्यांनी मौलाना यांच्यावर हिंदूंविरुद्ध द्वेष पसरवल्याचा आरोप केला.त्यानंतर गुजरातमधील जुनागडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.मौलानावर कलम 153A,505,188,114 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आणि रविवारी कार्यक्रमात उपस्थित असलेल्या इतर 2 लोकांना ताब्यात घेण्यात आले.गुजरात एटीएसने मौलानाला दोन दिवसांच्या ट्रान्झिट रिमांडवर घेतले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.