व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

ज्यांना उमेदवार आवडत नाही त्यांनी पक्षाला तर ज्यांना पक्ष आवडत नसेल त्यांनी उमेदवारांना पाहून मतदान द्या-पंकजा मुंडे

विरोधी पक्षाकडे मुद्दाच नसल्याने,चुकीची आफवा पसरविणे सुरू-आ.सुरेश धस

0
  • click2ashti update-बीड जिल्ह्यात येणा-या पाच वर्षात कॅन्सर हांस्पीटल व दहा हजार तरूणांना रोजगार देणार असून हे काम करण्यासाठी बीड जिल्ह्यातील सुज्ञ मतदारांनी ज्यांना मी आवडत नाही त्यांनी भाजपाला पाहून मतदान द्या,ज्यांना भाजपा आवडत नाही त्यांनी माझ्याकडे पाहून मतदान द्या करा व जिल्हाचा विकास करण्याची संधी द्यावी असे विधान पंकजा मुंडे यांनी केले तर सध्या देशात विरोधी पक्षाकडे कसलेच विकासाचे मुद्दे नसल्याने ते भाजपाचा अप प्रचार करत नसून,समाजामध्ये विष कालवण्याच्या प्रयत्न करीत असल्याचा हल्ला आ.सुरेश धस यांनी विरोधी पक्षावर चढवला आहे.


भाजपा,महायुतीचे बीड लोकसभा निवडणूकीचे उमेदवार पंकजा मुंडे यांची आष्टी येथील छ.शिवाजी महाराज चौक येथे दि.१८ रोजी सांयकाळी ६ वा.प्रचारसभेत पंकजा मुंडे बोलत होत्या.यावेळी व्यासपीठावर आ.सुरेश धस,भाजपा तालुकाध्यक्ष अॅड.साहेबराव म्हस्के,युवानेते जयदत्त धस,माजी जि.प.अध्यक्षा सविता गोल्हार,अॅड.वाल्मिक निकाळजे,माजी सभापती बद्रीनाथ जगताप,अनुरथ सानप,माजी उपसभापती अजिनाथ सानप,डाॅ.शैलाजा गर्जे,नगराध्यक्ष जिया बेग,उपनगराध्यक्ष शैलेश सहस्ञबुद्दे,माजी नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे,व्यापारी संघटनेचे संजय मेहेर,अरूण निकाळजे,यशवंत खंडागळे,नगरसेवक भारत मुरकूटे,सुरेश वारंगुळे,शेख शरीफ,शाम वाल्हेकर, शिवसेनेचे जालिंदर वांढरे,नगर पंचायतचे गटनेते किशोर झरेकर,दत्तोबा वाडेकर,संजय आजबे यांच्यासह आदि मान्यवर उपस्थित होते.पुढे बोलतांना पंकजा मुंडे म्हणाल्या,बीड जिल्ह्याच्या लोकसभेच्या मी पाचवी निवडणूक मी पाहत आहे.दर निवडणूकीला वातावरण वेगळे निर्माण होते आणि निकाल वेगळाच लागतो.निवडणूकीत मतदारांना उमेदवार पसंत पडत नाही.पण आता बीड जिल्ह्यात वेगळी परिस्थिती निर्माण आहे.येथे पक्ष पसंद नाही आणि उमेदवार पसंद असल्याचे दिसून येते.मला मतदार म्हणतात आमचा पक्षावर राग आहे तुमच्यावर नाही.मी आत्तापर्यंत प्रचाराला फिरत असून,कुणीही तक्रार केली नाही.उलट हा रस्ता,हे काम ते काम तुमच्या काळात झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

आज मी दिवसभरात बीड जिल्ह्यातील जाटनांदूर पासून आष्टी पर्यंत सगळे केलेले काम मला दिसले ते पाहून मला समाधान वाटले. ४ जून २०१४ ला बाबांचा जिल्हाने सत्कार करण्याचे ठरविले होते.पण त्याच दिवशी त्यांच्यावर अत्यंसंस्कार करण्याची दुर्देवी वेळ आपल्यावर आली.आता दहा वर्षानंतर पुन्हा एकदा निकालाची तारीख ४ जून आली आणि हे सर्व योगायोग जुळून आला आहे.हि निवडणूक देशातील सर्वेच्च सभागृहाची निवडणूक आहे.आणि तुमची लेक मोठ्या पार्टीची उमेदवार आहे.मला मागच्या निवडणूकीत आष्टी विधानसभेने ७० हजाराची लिड दिली.आता पुन्हा एकदा आपण मोठ्या मताने मला निवडणूकीत लिड देताल.राजकारण करायचे म्हणजे कोण्या येड्या गबाळाचे काम नाही,माझ्या सत्तेच्या काळात जे काहि काम केले ते सांगायचे म्हणलं तर वेळ पुरणार नाही.एवढे काम केले ते शब्दात सांगू शकणार नाही.
सध्याचा उमेदवार मी गरीब आहे,मग तुम्ही गरीब होतात तर एवढे गडगंज श्रीमंत कसे झालात.पंकजा मुंडेचे या निवडणूकीत अवघड आहे.अशी आफवा पसरविली मला माझ्या दौरात मुस्लिम मतदार सुध्दा ताई आम्ही तुमच्या सोबत असल्याचे सांगतात.आणि आत्ताचे समोरचे उमेदवाराने मागच्या निवडणूकीत ५ लाख मते घेतले आणि परत पाच वर्ष कुठेच दिसले नाहीत.माझ्या काळात आलेले अधिकारी हे जात पाहून आणले नाहीत जे काम करतील तेच येथे आणले आहेत.मी फक्त काम करून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर निधी आणले आहेत.ज्यांना मी आवडत नाही त्यांनी भाजपाला पाहून मतदान द्या,ज्यांना भाजपा आवडत नाही त्यांनी माझ्याकडे पाहून मतदान द्या असेही पंकजा मुंडे यांनी केले.मला येणा-या पाच वर्षात जिल्ह्यात मोठे कॅन्सर हाॅस्पीटल व दहा हजार तरूणांना रोजगार मिळवून देण्याचे काम करणार असल्याचे त्यांनी सांगीतले.यावेळी आ.सुरेश म्हणाले,लोकसभेची निवडणूक लागल्यानंतर तीन मुद्दे समोर आले आहेत.काॅग्रेस पक्षाला आणि त्यांच्या सहकारी पक्षाला अतिशय कनवळा येत आहे.पहिला मुद्दा सीएए कायदा याचा बागुलबुआ करत मुस्लिम समाजामध्ये गैरसमज करत आहेत.त्याचा विषय वेगळाच आहे.दुसरा मुद्दा एनआरसीचा कायदा देशाच्या चार राज्यापुरताच मर्यादीत आसतांना देशात त्याचा काहिही संबंध नसतांना त्याचाही बागुलबुआ एवढा केला की,विचारूच नका आष्टीचा नगराध्यक्ष कट्टर कमळावर निवडून आलेला मुस्लिम समाजाचा केला आहे.भाजपाने कधीही जातीवाद केला नाही त्यामुळे एनआरसी व सीसीए कायद्यावर विश्वास ठेऊ नये,अन् तिसरा मुद्दा भाजपाने अबकी बार ४०० पार म्हणल्यावर काॅग्रेसवाल्यांनी हे संविधान बदलणार असल्याची फूस सोडली आहे.भाजपाने शेवटच्या घटकापर्यंत जाण्याची यशस्वी पणे राबविले आहे.त्यामुळे त्यांचा सगळा खेळ झाला आहे.आता सध्या आरक्षणाचा मुद्दा जागत असून,मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिले.आता ओबीसीमधून आरक्षण द्या म्हणता कोणता पक्ष म्हणतोय की ओबीसीतून आरक्षण द्या त्यांना तुम्ही मतदान करा असे कोणीही म्हणत नाही.सध्याच्या शिंदे सरकारने प्रामाणिकपणे मराठा समाजाला आरक्षण देण्याचे काम केले त्यांनाही आपण नाव ठेवत असल्याची खंतही आ.धस व्यक्त केली.यावेळी अॅड.वाल्मिक निकाळजे, अॅड.साहेबराव म्हस्के,यांची भाषणे झाली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक रंगनाथ धोंडे यांनी तर सुञसंचालन माजी नगरसेवक दिपक निकाळजे यांनी केले.


एक चुक परळीकरांच्या आता लक्षात आली
गेल्या विधानसभेत माझा परळी विधानसभेत पराभव झाला आता परळी करांना ती चुक या पाच वर्षात लक्षात आली.सध्या लई निधी आणले,रस्ते आणले,पण शेतक-यांच्या खात्यावर पिकविमा आला का?कशामुळे नाही आले हे आता परळीकरांनसह जिल्ह्याच्या लक्षात आले.
मी संविधानीक पदावर असल्यावर कधीही दुजाभाव करत नसल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगीतले.
कायद्याच्या पुढे कोणीही नाही
मराठा समाजाचे आरक्षण आणि माझा काय संबंध मराठा समाजाला आरक्षण कायद्याने मिळणार आहे.आणि ते नुसते आरक्षण देयचे म्हणून नाही तर ते संविधानात बसले पाहिजे असे आरक्षण मिळवून देण्यासाठी आम्ही या आगोदरही आणि येथून पुढेही प्रयत्न करणार असून,कायद्याच्या पुढे कोणीही नाही असेही सुचक वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केले.
आमच्यात मतभेद नाहीत
सध्या माझ्या सभा पाहून विरोधकांना गुदगुल्या होत असतील पण आज आमदार धस साहेबांची सभा झाली त्यांनी त्यांची शक्ती दाखवली तसेच उद्या मी माजी आ.धोंडे व आमदार आजबे यांची सभा होणार आहे. त्यांनी त्यांची शक्ती दाखवावी आणि हि युती मी नाही ठरवली ती वरूनच ठरली आहे.परंतु हे सर्व एकञ राहून मला प्रंचड मताने विजय करतील हिच आपेक्षा असेही पंकजा मुंडे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.