पंकजा मुंडे यांचा पराभव गावाच्या जिव्हारी;पाच दिवसापासून गाव उपाशी
आष्टी तालुक्यातील पांगुळगव्हाण येथील चिञ
click2ashti update-आष्टी शहरापासून सात कि.मी. अंतरावर असलेल्या पांगुळगव्हाण गावात बीड लोकसभा निवडणूकीत महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना या गावाने 1000 हजार मतापैकी 926 एकगठ्ठा मते देऊनही त्यांचा पराभव झाल्याने या गावात मागील 4 दिवसांपासून एकही चूल पेटली नसल्याचा दावा बुधवावरी ग्रामस्थांनी केला.गावातील मारूती मंदिरात ग्रामस्थांकडून अन्नत्याग आंदोलन सुरू आहे.
आष्टी तालुक्यातील पांगुळगव्हाण गावाची लोकसंख्खा 1200 च्या घरात असुन या गावात एक हजार मतदान आहे.बीड लोकसभा निवडणूकीत या गावाने महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना 980 पैकी 926
एवढे मतदान केले आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवने यांच्यासह अन्य 40 उमेदवारांना या गावातुन एकही मत मिळालेले नाही. मतदान करूनही महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्याने
या गावातील चुल पेटलेली नसल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.पंकजा मुंडे यांना केंद्रात मंत्रीपद देऊन राजकीय पुनवर्सन झाल्याशिवाय गावात चुल न पेटवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. अन्नत्याग आंदोलनात हरीभाऊ गिते,शिवाजी गिते,नंदु गिते,गहिनीनाथ गिते,रोहिदास गिते, तानाजी गिते सहभागी झाले,अशी माहिती पांगुळगव्हानचे सरपंच तुकाराम गिते यांनी दिली.