व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

बीड पाठोपाठ नगरच्या मल्टीस्टेट मध्ये ५४ कोटींचा घोटाळा करून चेअरमन संचालक मंडळ फरार

नगर जिल्ह्यातील मोठ्या मल्टीस्टेटच्या भाच्याची आहे "भाग्यलक्ष्मी"

0

click2ashti update-बीड जिल्ह्यातील हाजोरो कोटींची उलाढाल असलेल्या कुटे ग्रुप संचालीत ज्ञानधारा मल्टीस्टेट सह राजस्थानी मल्टीस्टेट,जिजाऊ माँ साहेब मल्टीस्टेट,शुभ कल्याण मल्टीस्टेट,परिवर्तन मल्टीस्टेट यासह बीड जिल्ह्यात आदि मल्टीस्टेटने जिल्हा वासियांना गंडा घातला असतानाच आता नगर जिल्ह्यातील ही मल्टीस्टेट दिवाळीखोरीत निघाल्या आहेत.अहमदनगर येथील भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट मुख्य शाखा पाईपलाईन रोड येथे पतसंस्थेमध्ये गेल्या २ वर्षापासून ठेवीदार हे वेळोवेळी रक्कम भरणा करत आहे.या संस्थेमध्ये ठेवीदारांनी अंदाजे रक्कम रुपये ५४ कोटी रुपये संस्थेमध्ये
घोटाळा केल्याचे समोर आले असून मल्टीस्टेटचे चेअरमन व संचालक यांच्यावर गुन्हा दाखल करावा यासाठी ठेवीदारांनी पोलिस अधीक्षक यांच्याकडे धाव घेतली आहे.

याबाबत अधिक मिळालेली माहिती अशी,या संस्थेमध्ये ठेवीदारांनी अंदाजे रक्कम रुपये ५४ कोटी रुपये जमा केलेले आहे.परंतु संस्थेचे चेअरमन भारत बबन पुंड व इतर १० संचालक तसेच संस्थेतील सर्व कर्मचारी यांनी संगम मताने गेल्या ६ महिन्यापासून ठेवीदारांना पैसे परत केले नाही.तसेच उडवा उडवी चे उत्तर देत असून ठेवीदारांना पैसे परत देत नाही.या कारणास्तव सर्व ठेवीदारांनी निर्णय घेत संस्थेचे संचालक मंडळ व कर्मचारी यांच्या विरोधात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी तोफखाना पोलीस स्टेशन येथे गेले असता तेथे २० ते २५ दिवस लागतील गुन्हा दाखल होण्यासाठी व उडवा उडवीचे उत्तरे देत असून जन आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे यांच्या मदतीने सर्व
ठेवीदार पोलीस अधीक्षक कार्यालयावर गेले.संबंधित भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट पतसंस्थेच्या गैरकारभाराचा प्रश्न पोलीस अधीक्षक यांच्याकडे मांडली असल्याचे ठेवीदारांनी सांगितले.पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन संस्थेचे चेअरमन व संचालक तसेच संस्थेतील सर्व कर्मचारी यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली असून यावेळी जनआधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे समवेत सर्व ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नगर जिल्ह्यातील मोठ्या मल्टीस्टेटच्या भाच्याची आहे “भाग्यलक्ष्मी” मल्टीस्टेट
अहमदनगर-बीड-जालना-छ.संभाजी नगर,नाशिक,पुणे या जिल्ह्यात सुमारे ५० पेक्षा शाखा व हाजारो कोटी रूपायांच्या ठेवी असलेल्या मोठ्या मल्टीस्टेटच्या चेअरमनचा ही “भाग्यलक्ष्मी”मल्टीस्टेट सख्खा भाच्याची असल्याचे बोलले जात आहे.
ठेवीदारांनी आता तरी विचार करावा
ठेवीदार पै-पै जमा करून या असल्या ना दाद,ना फिर्याद भंगार मल्टीस्टेट मध्ये आपले पैसे जमा करता अन् या मल्टीस्टेटवाल्यांनी चंबु गबाळ गुंडाळून घेतल्यावर पोलिस प्रशासानाकडे धाव घेतात.नंतर मात्र काहितरी उपयोग होत नाही.आत्तापर्यंत ज्या मल्टीस्टेट चे घोटाळे उघड झाले त्यातील एकाही ठेवीदारांना दमडी मिळाली नाही.त्यामुळे ठेवीदारांनी मल्टीस्टेट कितीही चांगली असली तरी आपल्या ठेवी योग्य विचार करावा.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.