उध्वस्त केलेल्या कत्तलखान्यात गोमांस सापडतोच कसा..? खडकत परिसरात पिकअपसह दीड टन गोमांस पकडले,पावणे बारा लाखांचा मुद्देमाल जप्त
आष्टी पोलिसांची कारवाई
click2ashti update-जे आष्टी पोलिसांना जमले नाही ते गोरक्षक शिवकुमार स्वामी यांनी करून दाखवत आष्टी तालुक्यात अवैध रित्या सुरू असलेला कत्तलखाना पाला-मुळासहित जमिनदोस्त केला.परंतु हि कारवाई होऊन सहा महिने होत नाही तोच या खडकत परिसरातून दररोज हजारो टन गोमांस येथून बाहेर जातोच कसा?असा प्रश्न जनतेतून होत आहे.शनिवार (दि.१४)रोजी पहाटेच्या सुमारास आष्टी पोलिसांनी जामखेड-खडकत रोडवरील सिनानदी पुलावर पिक अप मध्ये चाललेला दिड टन गोवंशीय गोमांस पकडत पिक अप वाहनांसह ११ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आष्टी तालुक्यातील खडकत परिसरात सीना नदीच्या पुलावर शनिवारी पहाटेच्या सुमारास पोलिसांनी एका पिकअपचा पाठलाग करत त्यामध्ये असलेला दिड टन गोमांस पोलिसांनी जप्त केला आहे.यामध्ये पिकप मालकासह इनायत अली शौकत (वय-५४) राहणार अहमदनगर यांच्याविरुद्ध आष्टी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान सहा महिन्यापुर्वीच गोरक्ष शिवकुमार स्वामी यांनी डायरेक्ट गृहमंत्र्यांनकडून कारवाईचे आदेश आणत येथे सुरू असलेला कत्तलखाना पाला-मुळ्यासहित नष्ट केला होता.त्यामुळे आता या ठिकाणी गोहत्या होणार नाही,असे वाटत होते.परंतु एवढी मोठी कारवाई होऊनही खडकत गावातून दररोज हजारो टन गोमांस विक्रीसाठी बाहेर जात असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.तरी पोलिसांनी यावर कारवाई करावी अशी मागणी नागरीकातून होत आहे.