व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

फडणवीसांना शेवटची संधी, नंतर त्यांना बोलायला ही जागा राहणार नाही : मनोज जरांगे

0

जालना click2news मराठा समाजाला आरक्षण द्या, अजुनही वेळ गेली नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ही आता शेवटी संधी आहे. त्यांनी लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी मान्य करावी नसता त्यांना आता बोलायलाही जागा राहणार नाही असा इशारा मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी सहाव्यांदा अंतरवली सराटी येथे आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. यावेळी जरांगे यांनी महायुती सरकार तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. गेल्या वर्षभरापासून मराठा समाज आरक्षणासाठी लढा देत आहे. मात्र महायुती सरकार आणि देवेंद्र फडणवीस मराठा समाजाच्या मागण्या मान्य करत नाहीत. सरकारकडून मराठा समाजावर अन्याय केला जात आहे असे सांगून देवेंद्र फडणवीस हेच मराठा आरक्षणाच्या विरोधात असल्याचा आरोप जरांगे यांनी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.