सोमवारी तिरुपती बालाजी मंदिरात शुद्धीकरण विधी संपन्न;या विधीस आष्टीच्या तरूणांची उपस्थिती
तिरूपती click2news-तिरुपती मंदिरातील प्रसादाच्या लाडूंमध्ये प्राण्यांच्या चरबीचा वापर केल्याच्या आरोपामुळे भाविक आणि संत समाजात संताप वाढत आहे.अनेक मंदिरांनी बाहेरून येणारा प्रसाद देवाला देण्यास बंदी घातली आहे. वादाच्या दरम्यान,सोमवार (दि.२३)रोजी तिरुमला मंदिरात शुद्धीकरण विधी पार पडले.या विधीस आष्टी शहरातील तरुणांनी उपस्थिती लावून तिरूपती बालाजी च्या प्रसादाचा लाभही घेतला आहे.
तिरुपती मंदिरातील लाडूंमध्ये प्राण्यांच्या चरबीचा वापर केल्याच्या आरोपामुळे देशभर उलटसुलट चर्चा सुरु असून भाविक आणि संत समाजात संताप वाढत आहे.अनेक मंदिरांनी बाहेरून येणारा प्रसाद देवाला देण्यास बंदी घातली आहे. वादाच्या दरम्यान,सोमवार (दि.२३)रोजी तिरुमला मंदिरात शुद्धीकरण विधी पार पडले.या पूजेत भगवान व्यंकटेश्वर स्वामींकडे मंत्रोच्चार करत क्षमा मागितली गेली.मंदिराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ तास चाललेल्या या शुद्धीकरण पूजेमध्ये पंचगव्य प्रक्षानेद्वारे भगवान प्रसन्न झाले.तिरुमला तिरुपती देवस्थान ने या महाशांती होमचे आयोजन केले होते,ज्यात मंदिराचे पुजारी आणि देवस्थानचे अधिकारी देशातील अनेक भागातील भाविकांसह आष्टी येथील प्रितम बोगावत,चेतन मेहेर,अमित गुंदेचा,विपुल पितळे, मुर्शदपुर ग्रामपंचायत सदस्य अक्षय हाळपावत,गणेश दळवी आदि उपस्थित होते.