व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

पोषणाचे महत्त्व ग्रामीण भागापर्यंत पोहोचावे यासाठी राष्ट्रीय महापोषण अभियान-रत्नमाला बारकुल

0

आष्टी click2news-पोषणाचे महत्त्व ग्रामीण भागापर्यंत पोहोचावे यासाठी राष्ट्रीय महापोषण अभियान अंतर्गत कुपोषणाचा प्रश्न मिटावा व बालमृत्यू,गरोदर मातामृत्यू कमी करणे तसेच सुदृढ सृजनशील समाज निर्मितीसाठी राष्ट्रीय पोषण अभियान अंतर्गत जनजागृतीचे काम करण्यात येत असल्याचे प्रतिपादन बीड येथील एकात्मिक बालविकास कार्यालयाचे पर्यवेक्षिका रत्नमाला बारकुल यांनी केले आहे.

आष्टी-येथील राम मंदिरात पोषण आहाराचे प्रात्यक्षिक ठेवण्यात आले होते.

आष्टी शहरातील प्रभाग क्रं.३ मधील राम मंदीर सभागृहात गुरुवार दि.२६ रोजी दुपारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बारकुल बोलत होत्या.यावेळी अंगणवाडी सेविका प्रियंका मुळे,ज्योति मुस्के,मनिषा खुळपे,अर्चना टेकाडे,अश्विनी हजारे,उर्मिला गव्हाणे,उषा राऊत,शोभा साठे,आशा काकडे,सायरा पठाण, संगिता सरोदे, धनश्री खामकर,शहामुन्नीया पठाण,संगिता मर्केडे यांच्यासह आदि उपस्थित होते.पोषण आहाराविषयी जनजागृतीसाठी किशोरवयीन मुली,स्तनदा माता व गरोदर यांच्यामार्फत रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या रांगोळी स्पर्धेमध्ये उपोषण हा केंद्रबिंदू मानून रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली.पोषण आहाराचे महत्त्व विशद करण्यासाठी पोषण आहार प्रदर्शन या ठिकाणी भरविण्यात आले होते.कार्यक्रमात परिसरातील किशोरवयीन मुली,स्तनदा माता, गरोदर माता यांनी सहभाग नोंदवला.यानिमित्ताने पोषण आहाराचे महत्त्व विशद करण्यात महिला बाल विकास विभाग यशस्वी होत आहे,असे रत्नमाला बारकुल यांनी सांगितले.या कार्यक्रमासाठी अंगणवाडी पर्यवेक्षिका,सेविका व मदतनीस यांचे सहकार्य लाभले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.