व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

विरोधकांच्या भूलथापांना जनतेने बळी पडू नये-आ.बाळासाहेब आजबे

आष्टी तालुक्यातील विविध गांवात आमदार आजबे यांचा संवाद

0

आष्टी click2ashti-गेल्या पाच वर्षाच्या काळामध्ये आपण ऑफिस मध्ये बसून नाही,तर मतदार संघातील प्रमुख गावांसह वाडी, वस्ती,तांड्यावर जाऊन तेथील नागरीकांच्या असलेल्या अडी-अडचणी जाणून,त्यांना आवश्यक असलेल्या सुविधा सोडविण्यासाठी प्राधान्य दिले आणि आपण जे काहि बोलतो ते कागदावर नाही तर प्रत्येक्षात केलेल्या कामांवर बोलतो.परंतु विरोधकांकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे.विरोधकांच्या भुलथापांना जनतेने बळी पडू नये असे प्रतिपादन आमदार बाळासाहेब आजबे यांनी केले आहे.
आष्टी,पाटोदा,शिरूर मतदार संघाचे आमदार बाळासाहेब आजबे यांचा गाव भेट दौरा सुरू असून,रविवार दिनांक 29 सप्टेंबर रोजी खरकटवाडी,देवळाली,लोखंडवाडी,घाटा पिंपरी,पिंपरी घाटा, म्हसोबाचीवाडी,कारखेल,तागडखेड,आरणवीहरा चिंचेवाडी या गावामध्ये जाऊन पाच वर्षात केलेल्या विकास कामांचे लोकार्पण व मंजूर असलेल्या कामांचे भूमिपूजन मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये केले.यावेळी आ.आजबे बोलत होते.याप्रसंगी हरिभाऊ दहातोंडे,परसराम मराठे, संदीप सुंबरे,शिवाजी शेकडे,महादेव डोके,नवनाथ तांदळे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पंडित पोकळे,सरपंच भारत भवरनगरसेवक नाजीम शेख,अंकुश तळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.या गाव भेट दौऱ्याला जनतेमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अनेक गावांमध्ये त्यांचे डीजे,ढोल ताशांच्या गजरात बैलगाडी मधून स्वागत केले जात आहे.देवळाली,घाटा इतर गावांमध्ये बोलताना आमदार बाळासाहेब आजबे म्हणाले,मतदारसंघात विकास कामे करण्यासाठी आपण प्रथम प्राधान्य दिले.गेल्या वीस वर्षांमध्ये माजी आमदारांनी जेवढा निधी आणला नाही त्यापेक्षा जास्त निधी आपण पाच वर्षांमध्ये मतदारसंघात आणला आहे.त्यामुळे प्रत्येक गाव,वाडी,वस्ती या ठिकाणी विकास कामे करण्यात आली आहेत.एक आमदार पाच वर्षात काय विकास करू शकतो हे आपण जनतेला या पाच वर्षांमध्ये दाखवून दिले आहे.वक्कल गायब करण्याची पद्धत आपण बंद केल्यामुळे लोकांना खऱ्या अर्थाने विकास कामे दिसत आहेत.दर्जेदार निपक्षपाती पणे काम करण्याला आपण महत्व दिले.त्यामुळे मतदारसंघात आज जिथे जाल तिथे विकास कामे दिसत आहेत.याचाच पोटशूळ विरोधी लोकांना उठला आहे.आमच्या विकास कामावर टीका केली जात आहे.मंजूर करून आणलेली कामेही मंजूर नाहीत असे खोटे बोलून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे.आता काहीच करता येईना म्हणून आम्ही केलेल्या विकास कामाचे बिले अडवण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत.आम्ही गेल्या पाच वर्षात निवडणूक संपल्यानंतर कधीही कोण कोणत्या पक्षाचा आहे.कोण विरोधक आहे. आपले-तुपले कधी केले नाही.परंतु काही लोकांना चांगल्या कामात खोडा घालण्याची सवय असल्यामुळे लोकांनी त्यांना गेले दहा वर्षापासून दूर ठेवले आहे.विरोधक आपल्याकडे काही काम घेऊन आले.तरी आपण कधीही दुजा भाव केला नाही.त्याचीच पावती म्हणून आज गावोगाव आपले मोठ्या उत्साहात स्वागत केले जात असून,जनतेच्या विश्वासाच्या जोरावर आपण येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी यावेळी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.