महसुल विभागात निवडणूक विभाग संभाळंने म्हणजे जिक्रीचे काम-तहसिलदार वैशाली पाटील
आष्टी click2ashti-समाजात काम करतांना सर्वात जास्त सर्वसामान्य लोकांचे कामे हे महसूल विभागात असतात आणि निवडणूक विभागात काम करून लोकांचे मने जिंकणे म्हणजे जिक्रीचे काम असल्याचे प्रतिपादन तहसिलदार वैशाली नेमगोंडा पाटील यांनी केले.
आष्टी तहसिल कार्यालयात अव्वल कारकून म्हणून कार्यरत असलेले राजाराम पवार यांचा सोमवार दि.३० रोजी सायंकाळी ५ वा.आयोजित करण्यात आलेल्या सेवानिवृत्त कार्यक्रमात तहसिलदार पाटील बोलत होत्या.यावेळी नायब तहसिलदार बाळदत्त मोरे,नायब तहसिलदार प्रकाश शिरशेवाड,राजाराम पवार सपत्नीक व्यासपीठावर उपस्थित होते.पुढे बोलतांना पाटील म्हणाल्या,महसूल विभागात काम करत असताना खुप जिक्रीचे काम असून,निवडणूक विभागात काम करणे म्हणजे काटेरी कसरत आहे.आणि ही काटेरी खुर्ची पवार यांनी व्यशस्वीपणे सांभाळली असल्याचेही तहसिलदार पाटील यांनी सांगितले.राजाराम पवार म्हणाले,मी 2004 मध्ये आष्टी तहसिल कार्यालयात रूजू होऊन जालना, अंबड,मंठा येथे नोकरी करून मी 2014 ला पुन्हा आष्टी येथे कार्यरत झालो आणि येथेच मला सेवा निवृत्ती मिळाली आहे.या नोकरीच्या कामातून निष्कलंक बाहेर पडत असल्याचा आनंदही मला झाला असल्याचे पवार यांनी सांगितले.यावेळी उपनगराध्यक्ष शैलेश सहस्त्रबुध्दे,सभापती सुरेश वारंगुळे,महसूल संघटनेचे अध्यक्ष शरद शिंदे,शिवसेना नेते जालिंदर वांढरे,क-हेवाडीचे माजी सरपंच जालिंदर गायकवाड यांच्यासह तलाठी,मंडळधिकारी,तहसिल कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स्वानंद थोरवे यांनी करून आभार मानले.