व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

मुख्यमंत्रीपदावर काँग्रेसचा दावा

0

मुंबई click2news लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर काँग्रेस नेत्यांचे मनोबल वाढले असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा महायुतीचे सरकार येणार नसून महाविकास आघाडी सर्वाधिक जागा जिंकून सरकार स्थापन करेल आिण मुख्यमंत्री काँग्रेसचाच असेल असा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
काँग्रेसच्या वतीने साताऱ्यात आयोजित कार्यक्रमात ते बाेलत होते. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने ३० जागा जिंकल्या आहेत. यापैकी काँग्रेसने सर्वाधिक १३ जागांवर विजय मिळविला. यामुळे काँग्रेसच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. राज्यातील महायुती सरकारला मतदार वैतागला असून यंदा नक्की सत्तापालट होईल 288 सदस्यीय विधानसभेत महाविकास आघाडी 180 हून अधिक जागा जिंकून सरकार स्थापन करेल, असा विश्वासही चव्हाण यांनी व्यक्त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.